शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:18 IST

आळंदीत पहिली रिंगण वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

पुणे : आपण सगळे वारकरी घरातून आलेलो आहोत. आपल्या मनावर या परंपरेचे पावित्र्य बिंबवलेले आहे. पण, कुणी त्याचा वापर करून समाजातील वातावरण बिघडवत असेल तर, ते आपण सहन करू नये, असे मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि रिंगण प्रकाशन यांच्या वतीने आळंदी येथे रविवारी (दि. १५) रिंगण वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डुडुळगाव, आळंदी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ६८ स्पर्धकांनी भाग घेतला. संत विचारांवर आधारित पहिली आणि एकमेव असलेली ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी खुली होती.

जगताप पुढे म्हणाले, वारकरी संप्रदाय वापर राजकारणासाठी एखाद्या भाडोत्री ट्रोलरसारखे करण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रवृत्तीला वेळीच रोखले पाहिजे. कीर्तन हे प्रबोधनाचे साधन आहे. पण, आता त्याचा राजकारणासाठी वापर होतोय का, यावर संत विचारांना मानणाऱ्यांनी लक्ष ठेवायला हवे.यश पाटील याने ११ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक तर, अभय आळशी याने ९ हजार रुपयांचे दुसरे पारितोषिक पटकावले. हे दोघेही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत. हर्षदा शेरकर (बारामती), चैतन्य कांबळे (कोल्हापूर) आणि चैतन्य बावधने (पुणे) यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला. महेश उशीर (अहमदनगर), तेजस पाटील (कोल्हापूर), वृषभ चौधरी (सिन्नर), प्रणव जगताप (पुणे), प्रथमेश धायगुडे (रायगड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कोल्हापूरचे डॉ. आलोक जत्राटकर आणि आळंदीचे भागवत महाराज साळुंके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्री गजानन महाराज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, 'रिंगण'चे संपादक सचिन परब, पुणे वक्तृत्व वाद मंडळाचे डॉ. पांडुरंग कंद आणि प्रवीण शिंदे यांनीही विचार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीvarkariवारकरी