शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करू नये - प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:18 IST

आळंदीत पहिली रिंगण वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

पुणे : आपण सगळे वारकरी घरातून आलेलो आहोत. आपल्या मनावर या परंपरेचे पावित्र्य बिंबवलेले आहे. पण, कुणी त्याचा वापर करून समाजातील वातावरण बिघडवत असेल तर, ते आपण सहन करू नये, असे मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ आणि रिंगण प्रकाशन यांच्या वतीने आळंदी येथे रविवारी (दि. १५) रिंगण वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डुडुळगाव, आळंदी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ६८ स्पर्धकांनी भाग घेतला. संत विचारांवर आधारित पहिली आणि एकमेव असलेली ही स्पर्धा १५ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी खुली होती.

जगताप पुढे म्हणाले, वारकरी संप्रदाय वापर राजकारणासाठी एखाद्या भाडोत्री ट्रोलरसारखे करण्याचा प्रकार वाढला आहे. या प्रवृत्तीला वेळीच रोखले पाहिजे. कीर्तन हे प्रबोधनाचे साधन आहे. पण, आता त्याचा राजकारणासाठी वापर होतोय का, यावर संत विचारांना मानणाऱ्यांनी लक्ष ठेवायला हवे.यश पाटील याने ११ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक तर, अभय आळशी याने ९ हजार रुपयांचे दुसरे पारितोषिक पटकावले. हे दोघेही ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत. हर्षदा शेरकर (बारामती), चैतन्य कांबळे (कोल्हापूर) आणि चैतन्य बावधने (पुणे) यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला. महेश उशीर (अहमदनगर), तेजस पाटील (कोल्हापूर), वृषभ चौधरी (सिन्नर), प्रणव जगताप (पुणे), प्रथमेश धायगुडे (रायगड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कोल्हापूरचे डॉ. आलोक जत्राटकर आणि आळंदीचे भागवत महाराज साळुंके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्री गजानन महाराज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, 'रिंगण'चे संपादक सचिन परब, पुणे वक्तृत्व वाद मंडळाचे डॉ. पांडुरंग कंद आणि प्रवीण शिंदे यांनीही विचार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीvarkariवारकरी