शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

शेतकरी संपामुळे भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 2:08 AM

भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे.

रहाटणी - भाजीपाला ही दैनंदिन गरज आहे. त्यामुळे आज कोणती भाजी खरेदी करावी, असा प्रश्न महिलांना दररोज सतावत असतो. परंतु आता भाजीची ‘चॉईस’ राहिली नाही. कारण राज्यात शेतकरीराजाने संप पुकारल्याने बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजी खावी तर कोणती, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना सतावत आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे पिंपरी येथील भाजी बाजारात फार कमी व मोजक्याच भाज्यांची आवक झाली़ त्यामुळे ग्राहकांना कोणतीच पसंती राहिली नाही़ सध्या ग्राहक मिळेल ती भाजी खरेदी करीत आहेत; मात्र तीही ‘मुहमांगे’ किमतीला त्यामुळे ग्राहक मोठ्या संकटात सापडला आहे. याचाच फायदा छोटे व्यावसायिक घेत आहेत. भाजी मंडईतील किमतीच्या तीन पटीने भाजी ग्राहकांना विकली जात आहे. भाजी ठेलेवाले, हातगाडीवाले संपाचे भांडवल करून ग्राहकांना लुटण्याचा धंदा सुरूकेला आहे.नाश्त्याला काय करायचे, जेवणात कोणती भाजी करायची आणि रात्रीच्या मेन्यूत कशाचा समावेश करायचा, अशी विवंचना महिलांना असते़ मात्र सकाळीच दारावर आलेला भाजीविक्रेता जेव्हा भाज्यांचे दर सांगतो त्या वेळी मात्र कोणती भाजी घ्यावी, असा प्रश्न महिलांना पडत आहे. या प्रश्नाचे उत्तर सध्या पतिराजाकडेही नाही. हा संप असाच सुरू राहिला तर ग्राहकांचे मोठे हाल होणार आहेत.शहरात काही शाळा सुरू झाल्या आहेत तर उर्वरित शाळा काही दिवसांनी सुरू होतील. भाज्यांचे दर स्थिर झाले नाहीत. दुधाचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागेल. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात दुधाचीही आवक कमी झाल्याने शहराच्या अनेक भागांत दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे, तर स्थानिक दुधवाल्याने अचानक दुधाचे दर वाढवून ग्राहकांची लूट सुरू केली आहे़ यावर सरकार कशा प्रकारे अंकुश ठेवणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.छोट्या मंडईत शुकशुकाटरहाटणी फाटा येथील मंडईत कोणत्याच प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध न झाल्याने अनेक विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. काही विक्रेत्यांनी आहे तोच माल चढ्या दराने विकला. काही विक्रेत्यांनी उपनगरांतील शेतमाल आणून विकला़ मात्र त्यासाठी तीन ते चार पटीने किंमत आकारण्यात आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या गावांत आणि उपनगरांत अद्यापही भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जात आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी हा भाजीपाला शेतातून खरेदी करून शहरात विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यासही जादा दर मिळत आहे. व्यापाºयालाही जादा नफा मिळत आहे. मात्र त्याबाबत कोणीही विचार करीत नसल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली.आठवडे बाजारही ओसपिंपळे सौदागर, रहाटणीसह परिसरात आणि शहरात आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले होते. राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे आठवडे बाजार सुरू केले आहेत. शेतकरीसंपामुळे या आठवडे बाजारांतही भाजीपाल्याची आवक झाली नाही. शेतकºयांनीही या बाजारांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे बाजार ओस पडले आहेत.सध्याची रोजच सुरू असलेली पेट्रोल दरवाढीमुळे गृहोपयोगी वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे. त्यात शेतकºयांनी संप सुरू केल्याने आणखी माहागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महिन्याचे ‘बजेट’ आवाक्या बाहेर गेले आहे. ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा होती; मात्र आम्हा सर्वसामान्य नागरिकांची पूर्ण निराशा झाली आहे. त्यामुळे आम्हाला कुणीच वाली नाही.- उषा कांबळे, गृहिणीसध्या शेतकºयांचा संप सुरू असल्याने भाज्यांची आवक म्हणावी तेवढी होत नाही. त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. ज्या ठिकाणी भाजी मिळते ती आणून ग्राहकांना काही फार चढ्या दराने विक्री करावी लागत आहे. मात्र संपाचा फटका विक्रेत्यांसह ग्राहकांना ही बसत आहे.- जगदीश नगरकर,भाजी विक्रेते

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारFarmer strikeशेतकरी संप