शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

प्राधिकरण परिसरात वाहतूक कोंडी, आकुर्डीतील म्हाळसाकांत चौक बनतोय अपघाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:41 AM

रावेत : आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकातील विविध खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षा, स्कूल बस, विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणा-या पालकांच्या दुचाकी यामुळे येथील शाळांच्या परिसरात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे.

रावेत : आकुर्डीतील म्हाळसाकांत चौकातील विविध खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षा, स्कूल बस, विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येणा-या पालकांच्या दुचाकी यामुळे येथील शाळांच्या परिसरात वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी, वॉर्डन उपस्थित असतानादेखील अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा ठरणाºया वाहनांकडे आणि हातगाड्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात, असे पालकांचे व नागरिकांचे म्हणणे आहे.शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणाºया बसेस आणि पालकांच्या गाड्या या प्रवेशद्वाराच्या समोर भर रस्त्यावर उभ्या करून विद्यार्थी चढ-उतर होईपर्यंत तशाच उभ्या असतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. शाळांच्या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला वाहतूककोंडी कायम आहे. म्हाळसाकांत चौक परिसरातील शाळां समोर वाहतुकीची कोंडी नित्याची आहे. त्यामुळे विद्यार्थांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.एकाच संस्थेच्या तीन शाळा, मैदाने असूनही बेशिस्त पार्किं ग, शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेचे नियोजन नसल्याने वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. प्राधिकरणाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाºया म्हाळसाकांत चौकात शिशू आणि प्राथमिक विद्यालय, म्हाळसाकांत विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय असून, या शाळेसमोर कायम वाहतूककोंडी दिसते. कोंडीमुळे शाळेच्या मार्गावर अनेक वाहनधारकांना श्वास रोखून वाहने चालवावी लागतात. शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेने दिलेल्या सूचनांना अनेक शाळांनी केराच्या टोपल्या दाखविल्या आहेत. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरातील शाळांनी समन्वयाने अंतर ठेवले तर वाहतूककोंडीचा हा विषय मार्गी लागू शकेल. सकाळी कामाला जाणाºयांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेऊन येणारे बसचालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे म्हाळसाकांत चौकात सगळे रस्ते सकाळी-सकाळी हाऊस फुल्ल होत आहेत. प्राधिकरण भागात अनेक शाळा, महाविद्यालये उपरस्त्यांवर किंवा दोन परिसरांना जोडणाºया रस्त्यांवर आहेत. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेस या रस्त्यांवर विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या बसेस आणि पालकांच्या गाड्यांची गर्दी असते. त्यातच सामान्य वाहतूक चालू असते.>पार्किंगची गरजदुचाकी, आॅटो रिक्षा आणि काही पालक चारचाकीमधून पाल्यांना सोडण्यासाठी येतात. त्या वेळी प्रचंड कोंडी होते. हीच स्थिती शाळा सुटल्यानंतरही असते. पार्किं गच्या ठिकाणी आॅटो रिक्षा आणि चारचाकी वाहनांचे पार्कि ंग केल्यास वाहतूककोंडी सुटू शकते. शाळे समोरच खाद्यपदार्थांच्या काही गाड्याही या कोंडीत भर घालतात. शाळांचे कर्मचारी प्रवेशद्वारावर उभे केल्यास वाहतूककोंडी कमी होऊ शकते.समन्वय साधण्याची आवश्यकताअनेक ठिकाणी स्कूल बस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. मुख्य रस्त्यावरूनच विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागत असल्याची पालकांची तक्रार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शाळेची परिवहन समिती,शिक्षण उपसंचालक कार्यालय, शहर वाहतूकनियंत्रण शाखा, पालक आणि रिक्षा व्यावसायिकांची संयुक्तपणे बैठक घेतल्यास वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा काढणे सहज शक्य आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.>शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जशी शाळांची आहे, त्याचप्रमाणे पालकांनीही काही गोष्टी पाळायला हव्यात. पालकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या ठिकाणी लावावीत़ शाळेने नियुक्त केलेली समिती वाहतूककोंडी होऊ नये म्हणून काम पाहत आहे. शालेय विभागाने वाहतुकीबाबत घालून दिलेल्या नियमावलीनुसार बसचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. - शैला गायकवाड, मुख्याध्यापिका, म्हाळसाकांत प्राथमिक विद्यालय>शाळे समोरील नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्याकरिता शालेय प्रशासनाने स्वतंत्र पार्किं ग व्यवस्था निर्माण करावी. हे शक्य नसेल तर आजूबाजूला उपलब्ध असणारे मैदान भाडे तत्त्वावर घ्यावे़ शालेय परिसरात सर्व बाजूने शंभर मीटर अंतरावर मोठ्या वाहनांना बंदी घालावी. तसेच उपाय म्हणून शाळांनी मुख्य चौकापासून शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत स्वत:चे गार्ड नेमावेत. शाळा भरताना आणि सुटताना वाहतूक पोलिसांनी मुख्य ठिकाणी लक्ष घालून वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करावा़ - मुश्ताक मुल्ला, पालक

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस