शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

यंदाचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा ३५० वा; वाद-प्रतिवादाकडे दुर्लक्ष करा, सदानंद मोरे स्पष्टच बोलले

By रोशन मोरे | Updated: June 5, 2023 20:04 IST

यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा ३५० वा आहे की नाही, याविषयी समाज माध्यमांवर वाद प्रतिवाद सुरु...

पिंपरी : यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा ३५० वा आहे की नाही, याविषयी समाज माध्यमांवर वाद प्रतिवाद केले जात आहेत. मात्र, यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा हा ३५० वा असून समाजमाध्यमांवर तो ३५० वा नाही असे म्हटले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करा. संपूर्ण वर्ष आपल्याला साजरे करायचे आहे. हा जो शक आहे त्यामध्ये योगायोगाने तेरा महिने आहेत. त्यामुळे हा सुकाळातला तेरावा महिना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.

मुळशीतील अनिल पवार यांच्या पुढाकाराने शिवराज्यभिषेकाच्या विविध पैलूंवर साकारण्यात येणाऱ्या ग्रंथाच्या माहितीसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदानंद मोरे बोलत होते.

सदानंद मोरे म्हणाले की, राज्यभिषेकाची परंपरा आपल्याकडे होती. मात्र, त्यामध्ये मोठा खंड पडला होता. यादव राजांचे राज्यभिषेक झाले मात्र, त्यानंतर ही परंपरा लुप्त झाली. या परंपरचे पुर्नजीवन शिवाजी महाराजांनी केले. सहाशे ते दोन हजार वर्ष खंडित झालेली शिवाजी महाराजांच्या कृत्याची नाळ ही एकुण भारतीय इतिहासाशी जोडता येते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार, इतिहास अभ्यासक गणेश राऊत, चेतन कोळी, जिंदा सांडभोर, मारुती गोळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नाव सार्थ ठरले

अनिल पवार यांनी सांगितले की, शिवभारत या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. महाराजांच्या जन्मामुळे जनता समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव सार्थ झाले, असा उल्लेख आढळतो. महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगावर पुस्तक आपल्याला मिळून येतात. मात्र, फक्त राज्याभिषेक केंद्रस्थानी ठेवून त्याचे विविध पैलू उलगडून सांगणाऱ्या ग्रंथांची संख्या कमी आहे. ती कमतरता ‘शिवराज्यभिषेक’ मुळे भरून निघेल.

टॅग्स :PuneपुणेShivrajyabhishekशिवराज्याभिषेकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिकPoliticsराजकारण