शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा ३५० वा; वाद-प्रतिवादाकडे दुर्लक्ष करा, सदानंद मोरे स्पष्टच बोलले

By रोशन मोरे | Updated: June 5, 2023 20:04 IST

यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा ३५० वा आहे की नाही, याविषयी समाज माध्यमांवर वाद प्रतिवाद सुरु...

पिंपरी : यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा ३५० वा आहे की नाही, याविषयी समाज माध्यमांवर वाद प्रतिवाद केले जात आहेत. मात्र, यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा हा ३५० वा असून समाजमाध्यमांवर तो ३५० वा नाही असे म्हटले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करा. संपूर्ण वर्ष आपल्याला साजरे करायचे आहे. हा जो शक आहे त्यामध्ये योगायोगाने तेरा महिने आहेत. त्यामुळे हा सुकाळातला तेरावा महिना आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी केले.

मुळशीतील अनिल पवार यांच्या पुढाकाराने शिवराज्यभिषेकाच्या विविध पैलूंवर साकारण्यात येणाऱ्या ग्रंथाच्या माहितीसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदानंद मोरे बोलत होते.

सदानंद मोरे म्हणाले की, राज्यभिषेकाची परंपरा आपल्याकडे होती. मात्र, त्यामध्ये मोठा खंड पडला होता. यादव राजांचे राज्यभिषेक झाले मात्र, त्यानंतर ही परंपरा लुप्त झाली. या परंपरचे पुर्नजीवन शिवाजी महाराजांनी केले. सहाशे ते दोन हजार वर्ष खंडित झालेली शिवाजी महाराजांच्या कृत्याची नाळ ही एकुण भारतीय इतिहासाशी जोडता येते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार, इतिहास अभ्यासक गणेश राऊत, चेतन कोळी, जिंदा सांडभोर, मारुती गोळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र नाव सार्थ ठरले

अनिल पवार यांनी सांगितले की, शिवभारत या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला. महाराजांच्या जन्मामुळे जनता समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव सार्थ झाले, असा उल्लेख आढळतो. महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगावर पुस्तक आपल्याला मिळून येतात. मात्र, फक्त राज्याभिषेक केंद्रस्थानी ठेवून त्याचे विविध पैलू उलगडून सांगणाऱ्या ग्रंथांची संख्या कमी आहे. ती कमतरता ‘शिवराज्यभिषेक’ मुळे भरून निघेल.

टॅग्स :PuneपुणेShivrajyabhishekशिवराज्याभिषेकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिकPoliticsराजकारण