शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

...म्हणून व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी ठरवलेल्या लग्नात घ्यावे लागले पाेलीस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:14 IST

कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडे लग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे.

पिंपरी : ‘व्हॅलेन्टाईन -डे’ अर्थात प्रेमदिनाचा मुहूर्त साधत पिंपरीतील भाटनगरमध्ये राहणाऱ्या तरूणीचा विवाह निश्चित झाला आहे. येरवड्यातून नवऱ्या मुलाला घेऊन वऱ्हाडी मंडळी गुरूवारी येणार असून काळेवाडीत दुपारी १२ वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडेलग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे. अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. 

कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्याचा दृढनिश्चय करून पिंपरी-चिंचवडमधील भाटनगर येथे राहणाऱ्या ऐश्वर्या तमाईचीकर या तरुणीने स्वत: कृतिशील पाऊल टाकले. कौमार्य चाचणीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी कंजारभाट समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींचा ‘स्टॉप दि व्ही व्हर्चुअल’ हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यावर अनिष्ट प्रथांना हद्दपार करण्याची जनजागृती मोहीम राबवली जात आहे. समाजातील जात पंचायत, तसेच कुप्रथांविरुद्धचा लढा सुरू केला. त्यात महिलांच्या कौमार्य चाचणीविरुद्ध तिने व ग्रुपमधील सहकाऱ्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली. जात पंचायतीचे पंच आणि ज्यांना समाजात परिवर्तन नको अशांनी या ग्रुपला कडाडून विरोध केला. कृष्णा इंद्रेकर, कृष्णा चांदगुडे, प्रियंका तमाईचीकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याबरोबर ऐश्वर्याने न डगमगता लढा सुरूच ठेवला आहे. समाजाचा विरोध पत्करून परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचा निर्धार केलेल्या ऐश्वर्या आणि विवेकचा १३ मे २०१८ ला पिंपरीत  कडक पोलीस बंदोबस्त विवाह झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला.जात पंचायत आणि जुन्या प्रथांबाबत आग्रही असलेल्या समाजातील काही लोकांकडून या सामाजिक परिवर्तनाविरूद्ध छुप्या कारवाई सुरूच आहेत. त्याचाच परिणाम विविध समारंभावर जाणवू लागला आहे. विशेषत: लग्न समारंभावेळी त्यांची ही अवस्वस्थता अधिक जाणवू लागल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी