शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

...म्हणून व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी ठरवलेल्या लग्नात घ्यावे लागले पाेलीस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:14 IST

कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडे लग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे.

पिंपरी : ‘व्हॅलेन्टाईन -डे’ अर्थात प्रेमदिनाचा मुहूर्त साधत पिंपरीतील भाटनगरमध्ये राहणाऱ्या तरूणीचा विवाह निश्चित झाला आहे. येरवड्यातून नवऱ्या मुलाला घेऊन वऱ्हाडी मंडळी गुरूवारी येणार असून काळेवाडीत दुपारी १२ वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडेलग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे. अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. 

कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्याचा दृढनिश्चय करून पिंपरी-चिंचवडमधील भाटनगर येथे राहणाऱ्या ऐश्वर्या तमाईचीकर या तरुणीने स्वत: कृतिशील पाऊल टाकले. कौमार्य चाचणीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी कंजारभाट समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींचा ‘स्टॉप दि व्ही व्हर्चुअल’ हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यावर अनिष्ट प्रथांना हद्दपार करण्याची जनजागृती मोहीम राबवली जात आहे. समाजातील जात पंचायत, तसेच कुप्रथांविरुद्धचा लढा सुरू केला. त्यात महिलांच्या कौमार्य चाचणीविरुद्ध तिने व ग्रुपमधील सहकाऱ्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली. जात पंचायतीचे पंच आणि ज्यांना समाजात परिवर्तन नको अशांनी या ग्रुपला कडाडून विरोध केला. कृष्णा इंद्रेकर, कृष्णा चांदगुडे, प्रियंका तमाईचीकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याबरोबर ऐश्वर्याने न डगमगता लढा सुरूच ठेवला आहे. समाजाचा विरोध पत्करून परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचा निर्धार केलेल्या ऐश्वर्या आणि विवेकचा १३ मे २०१८ ला पिंपरीत  कडक पोलीस बंदोबस्त विवाह झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला.जात पंचायत आणि जुन्या प्रथांबाबत आग्रही असलेल्या समाजातील काही लोकांकडून या सामाजिक परिवर्तनाविरूद्ध छुप्या कारवाई सुरूच आहेत. त्याचाच परिणाम विविध समारंभावर जाणवू लागला आहे. विशेषत: लग्न समारंभावेळी त्यांची ही अवस्वस्थता अधिक जाणवू लागल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी