शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

...म्हणून व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी ठरवलेल्या लग्नात घ्यावे लागले पाेलीस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 15:14 IST

कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडे लग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे.

पिंपरी : ‘व्हॅलेन्टाईन -डे’ अर्थात प्रेमदिनाचा मुहूर्त साधत पिंपरीतील भाटनगरमध्ये राहणाऱ्या तरूणीचा विवाह निश्चित झाला आहे. येरवड्यातून नवऱ्या मुलाला घेऊन वऱ्हाडी मंडळी गुरूवारी येणार असून काळेवाडीत दुपारी १२ वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र कंजारभाट समाजातील काही तरूण, तरुणी समाजातील कुप्रथांविरूद्धचा लढा देण्यासाठी पुढे आल्यामुळे अशा विवाह समारंभात भांडणे घडवुन आणण्याचे प्रकार सुरू आहेत. काही लोक विवाह समारंभावेळी गोंधळ करण्याची कुणकुण लागल्याने मुलीच्या आईने पिंपरी पोलिसांकडेलग्न समारंभाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा.अशी मागणी केली आहे. अशी माहिती पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. 

कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्याचा दृढनिश्चय करून पिंपरी-चिंचवडमधील भाटनगर येथे राहणाऱ्या ऐश्वर्या तमाईचीकर या तरुणीने स्वत: कृतिशील पाऊल टाकले. कौमार्य चाचणीची प्रथा संपुष्टात आणण्यासाठी कंजारभाट समाजातील सुशिक्षित तरुण-तरुणींचा ‘स्टॉप दि व्ही व्हर्चुअल’ हा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्यावर अनिष्ट प्रथांना हद्दपार करण्याची जनजागृती मोहीम राबवली जात आहे. समाजातील जात पंचायत, तसेच कुप्रथांविरुद्धचा लढा सुरू केला. त्यात महिलांच्या कौमार्य चाचणीविरुद्ध तिने व ग्रुपमधील सहकाऱ्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली. जात पंचायतीचे पंच आणि ज्यांना समाजात परिवर्तन नको अशांनी या ग्रुपला कडाडून विरोध केला. कृष्णा इंद्रेकर, कृष्णा चांदगुडे, प्रियंका तमाईचीकर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याबरोबर ऐश्वर्याने न डगमगता लढा सुरूच ठेवला आहे. समाजाचा विरोध पत्करून परिवर्तनाचे पाऊल टाकण्याचा निर्धार केलेल्या ऐश्वर्या आणि विवेकचा १३ मे २०१८ ला पिंपरीत  कडक पोलीस बंदोबस्त विवाह झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला.जात पंचायत आणि जुन्या प्रथांबाबत आग्रही असलेल्या समाजातील काही लोकांकडून या सामाजिक परिवर्तनाविरूद्ध छुप्या कारवाई सुरूच आहेत. त्याचाच परिणाम विविध समारंभावर जाणवू लागला आहे. विशेषत: लग्न समारंभावेळी त्यांची ही अवस्वस्थता अधिक जाणवू लागल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी