शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:57 IST

मराठा समाजाबाबत मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज आणि युवकांमध्ये संताप

पिंपरी : मराठा समाजाबाबत मंत्री तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर आहे. या वक्तव्यामुळे मराठा समाज आणि युवकांमध्ये संताप आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सावंत यांच्या तोंडून बोलत असल्याचे वाटते. मंत्री असे बोलताततच कसे? थोडक्यात काय तर थोडी मस्ती वाढली आहे, असे म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील सभासद नोंदणी आढाव्यासाठी काळेवाडी येथे सोमवारी मेळावा झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, जनमत विरोधात गेल्याने महापालिका निवडणुका घेण्यास सरकारचे धाडस नाही. त्यामुळे ते निवडणुका पुढे ढकलत आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसची भीती वाटते. त्यामुळे राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा एककलमी कार्यक्रम काही पक्षांनी घेतला आहे. वेदांता फाॅक्सकाॅन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मावळातील तळेगाव दाभाडे येथील साईटला पसंती दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून निमंत्रितही केले होते. त्यानंतरही प्रकल्प गुजरातमध्ये गेला. त्यामुळे महाविकास आघाडीवरील आरोप चुकीचे आहेत.  

‘अजितदादा हे आमच्याशी जास्त बोलतील की त्यांच्याशी?’

अजितदादांनी नाराजी व्यक्त केले असे चंद्रशेखर बावनकुळे सांगतात. यावर जयंत पाटील म्हणाले, अजितदादा आमच्याशी जास्त बोलतील की त्यांच्याशी? बावनकुळे यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची समजून काढून भाजपने त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यामुळे खरे तर बावनकुळेच नाराज असल्याचे दिसून येते. कदाचित राज्य सरकार कोसळेल आणि नवीन सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळेल, असे बावनकुळे यांना वाटत असावे.

‘एकनाथ खडसे यांच्यावर पूर्ण विश्वास’

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांशी संपर्क साधला असून, ते भाजपात जाणार असल्याबाबात जयंत पाटील म्हणाले, खडसे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी कुणाशी संपर्क साधला? काय चर्चा केली? किंवा काय झाले, याबाबत मी साधी चौकशी देखील केली नाही. ते राष्ट्रवादीमध्ये असून त्यांच्या जिल्ह्यात खडसे पक्षाचे जोरदार काम करीत आहेत. 

‘पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा हा गंभीर प्रकार’

पीएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. हा प्रकार गंभीर आहे. या संघटनेबाबत ‘इंटेलिजन्स’कडून राज्यातील पोलिसांना माहिती देण्यात आली असेलच. मात्र, राज्य सरकारचे नियंत्रण त्यावर असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे असे प्रकार होतात. सरकारने ॲक्शन घ्यावी.

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेTanaji Sawantतानाजी सावंतPoliticsराजकारण