शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

सुधा पूल : शंभरी पार करुनही वाहतूक सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:17 AM

तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

देहूगाव - तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील खालुंबे्रजवळील सुधा नदीवरील १०५ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या पुलाची स्थिती धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. पुलावर, तसेच जवळच अनेक अपघात झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेतल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करणार अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक करीत आहेत.प्रामुख्याने खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतून शेतीची उत्पादने व भाजीपाला (तरकारी) मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात पुरवला जातो. या परिसरातील भाजीपाला व धान्य पूर्वी तळेगाव, चिंचवड व देहूरोड रेल्वे स्टेशनकडे बैलगाडीच्या मदतीने आणला जात होता. मात्र, रस्त्यात नद्यांचे अडथळे येत होते. यापैकी देहूरोड व तळेगाव रेल्वे स्टेशनला जोडणाºया या तळेगाव-चाकण रस्त्यावर १९१२ मध्ये सुधा नदीवर पूल बांधण्यात आला. पुलामुळे पावसाळ्यातही मालाची वाहतूक सहज आणि वेगाने होऊ लागली. सध्या तळेगाव-चाकण हा रस्ता अहमदनगर व नाशिक जिल्ह्याला जोडणारा जुना व महत्त्वाचा राज्य मार्ग आहे.औद्योगिकीकरणामुळे याच रस्त्याकडेच्या खालुंब्रे, म्हाळुंगे (इंगळे), खराबबाडी, नाणेकरवाडी अशा गावांचा विकास झाला. याच रस्त्याला जोडणाºया आंबेठाण, शिंदे, वासुली, सुदुंबरे ही गावेही विकसित होत आहेत. परिणामी कामगार ववाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या सुरुवातीला देहूफाटा, तळेगाव व चाकणच्या बाजू अशा दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच पुलाला समांतर पूल उभारण्यात आला आहे. त्याच्याही सुरुवातीला हे खड्डे पाहायला मिळतात. हे खड्डे इतके मोठे आहेत, की कोणतेही वाहन सहज उलटू शकते.वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीत जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. तळेगावकडून चाकणकडे जाताना तर सुधा नदीच्या पुलाच्या मध्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, हा पूल धोकादायक झाला आहे.हा पूल १०० वर्षांचा झाला असून, तो वाहतुकीसाठी धोकादायक होऊ शकतो, असे पत्रही मागे ब्रिटिश सरकारने पाठविले होते. या पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाला असून, पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटलेले आहेत. प्रवेश करतानाच वळण असल्याने वाहने वेगाने येत असतात. अपघात झाल्यास या भागात वाहने थेट नदीपात्रात जातात. पुलाच्या खालील बाजूला दगडी भिंतीवर पिंपळाची झाडे उगवली असून, झाडांची मुळे भिंतीत गेली आहेत. यामुळे भिंती कमकुवत झाल्या आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे महाडसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत काय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड