शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जाचक अटींमुळे शैक्षणिक सहलीला विद्यार्थी मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 00:53 IST

शिक्षण विभागाच्या विविध अटी : एसटी महामंडळालाही आर्थिक तोटा

दावडी : प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीला जाणे शिक्षण विभागाच्या विविध अटीमुळे कठीण होऊन बसले आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसंदर्भात एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये नमूद असलेल्या विविध अटीची वेळीच पूर्तता करणे शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीला जाण्यास अनेक समस्या वाढल्या असून विद्यार्थ्यांना यापुढे सहलीला जाण्यास अडथळा निर्माण होणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फटका मात्र एसटी महामंडळाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नियमित शिक्षणासोबतच त्यांच्यासाठी शासन व शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. शैक्षणिक सहल त्यापैकी एक उपक्रम होय वर्षातून एकदा आयोजित केली जाणारी ही शैक्षणिक सहल प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आवडीची असते. त्यामुळे ते सहलीच्या प्रतीक्षेत असतात. शिक्षण विभागाने अलीकडे या शैक्षणिक सहलीच्या नियमांमध्ये काही फेरबदल केले आहेत. तसा आदेश संपूर्ण शाळा व्यवस्थापनाला पाठवण्यात आला आहे. नवीन अटीनुसार शिक्षक मुलांना सहलीसाठी नेण्यास धजावत नाहीत. विनापरवानगी सहलीचे आयोजन केल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार असल्याचेही या आदेशात नमूद केले आहे. दुसरीकडे, बहुतांश शाळा शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा वापर करतात. त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्नही मिळायचे. या सहलीचे आयोजन दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात करण्याचा प्रघात आहे. नवीन अटीनुसार सहलीचे आयोजन बंद केल्यास एसटीला शाळांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होणार आहे. नवीन आदेशानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची कमी काळात जुळवाजुळव करणे शक्य नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे.या आहेत नवीन अटी...४आधी सहलीचा प्रस्ताव तयार करून त्याला शिक्षण विभागाची परवानगी घेणे, तसेच त्या प्रस्तावासोबत मुख्याध्यापकाचे हमीपत्र जोडणे अनिवार्य आहे.शिवाय सहलीला जाणाºया विद्यार्थ्यांची यादी सहलीचे ठिकाण त्या ठिकाणाची माहिती शाळेपासून ठिकाणाचे अंतर व शिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचीपरवानगी विद्यार्थी व पालकांचे हमीपत्र सहलीला जाण्यासाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, संबंधित विद्यार्थ्यांचा विमा काढून त्याचे प्रमाणपत्र शिक्षण विभागाला सादर करणे आवश्यक आहे.एसटी महामंडळ शैक्षणिक सहलीसाठी स्वस्त दरात एसटी बसेस पुरवत असतात. तसेच काही दुदैवाने दुर्घटना घडल्यास प्रत्येकी १० लाख रुपयांचा विमा महामंडळ देते. प्रशिक्षित चालक, सुरक्षित प्रवास एसटीचा असतो. खेड तालुका व आंबेगाव तालुक्याचा काही भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे दर वर्षाला २५० प्रांसगिक करार होतात. यंदा मात्र आतापर्यंत शासनाच्या किचकट अटीमुळे फक्त १० शाळेचे प्रांसगिक करार झाले आहेत. त्यामुळे यंदा बसेस बुक झाल्या नाहीत. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक तोटा होणार असल्याचे राजगुरुनगर आगार व्यवस्थापनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.४विद्यार्थ्यांना ऐतिहासिक किल्ले, भौगलिक परिसर, कोकणचा समुद्र, मनोरंजन स्थळे, बागबगीचे, प्राचीन देवस्थान, लेण्या, थंड हवेची ठिकाणे, सायन्स पार्क इत्यादी ठिकाणांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी शैक्षणिक सहली आयोजित करण्यात येतात.४मात्र शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे विद्यार्थ्यांना यापुढे शैक्षणिक सहलीला मुकावे लागणार आहे.४शिक्षण विभागाने ह्या अटी शिथिल कराव्या, असे मुख्याध्यापक व शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Bus DriverबसचालकEducationशिक्षणtourismपर्यटन