शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 3:07 AM

नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.

दिघी : आदर्शनगरमधील छत्रपती संभाजीमहाराज चौक व आजूबाजूच्या परिसरातील विद्युत खांबावरून दिला गेलेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शिवाय अचानक तारा तुटून पडल्याच्या घटना सारख्या घडत असल्याची ताजी घटना हिंदू कॉलनीमध्ये सोमवारी सकाळी घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे.सकाळी सात वाजता अचानक स्पार्किं ग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली तार तुटून खाली पडली. नशीब बलवत्तर सुदैवाने कुठलीही जीवितहानी वा कुणाला इजा झाली नाही. तार तुटून खाली पडताच अर्थिंगमुळे तारेमधील वीजपुरवठा खंडित झाला. परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊनसुद्धा नागरिकांनी काळजी घेत नागरिकांना सजग केले. या वेळी स्थानिक नागरिकांनी वीजवितरण कंपनीच्या तक्रार निवारण कक्षाच्या नंबरवर फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र कर्मचाऱ्यांनी दुसºया नंबरवर फोन करून तक्रार देण्यास सांगितले. दुसºया नंबरवर तक्रार देऊनही तीन चार तास उलटूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांनी तसदी घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीच्या गहाळ कारभारावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.खबरदारी : थोडक्यात बचावली मुलेज्ञानेश्वर पार्कमध्ये सुद्धा स्पार्किंग होऊन वीजप्रवाह सुरू असलेली वायर जमिनीलगत आली होती. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात खेळणाºया लहान मुलांना विजेचा धक्का बसण्यापासून थोडक्यात बचावला. या वेळी परिसरातील दीपक कुलकर्णी यांनी वेळीच खबरदारी घेत तुटलेल्या वायरींना वर बांधून ठेवले. ही माहिती अधिकाºयांना देण्यात आली. या घटनेतसुद्धा कर्मचारी यांनी वीजपुरवठा खंडित झाला नाही व तशी कुणाची तक्रार नसल्याने काम न करता व या घटनेचे कारण न शोधता काढता पाय घेतला.घटनांमध्ये होतेय सातत्याने वाढवीज तारा तुटून पडल्याच्या घटना आदर्शनगर परिसरात वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी दिघीतील सह्याद्री कॉलनीमध्ये तारा तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्या वेळेससुद्धा महावितरण कंपनीची दिरंगाई प्रकर्षाने पुढे आली होती. परिसरातील छत्रपती संभाजीमहाराज चौकातील बाजारपेठ, आदर्शनगर परिसर, ज्ञानेश्वर पार्क, गजाननमहाराज नगर अशा अनेक भागांतील भूमिगत केबलची कामे प्रलंबित आहेत. या ठिकाणी एकाच विद्युत खांबावर असलेले वायरींचे जाळे झाल्याने वीजपुरवठा खंडित होणे, तारा तुटून पडल्याच्या घटना घडत आहेत. यावर उपाययोजना करून भूमिगत केबलची कामे होणे आवश्यक आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण