शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिवसेना नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात; शिवसैनिकांची राऊतांसमोर जाहीरपणे नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:59 IST

आगामी २०२९ ला होणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या वतीने स्वबळावर लढविण्यात येईल

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी चिंचवड येथे झाली. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘पक्षाचे वरिष्ठ नेते पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात, चारपैकी एकही जागा मिळाली नाही, हे कार्यकर्त्यांचे दुर्दैव आहे,’ अशी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यावर 'विरोधकांची ताकद दाखवून द्या, आंदोलने करा, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी झाली. दुपारी चारला बैठक सुरू झाली. शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी, त्यानंतर मावळ मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीस शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, मावळ संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, युवानेते चेतन पवार आदी उपस्थित होते.

वरिष्ठ नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात

लोकसभेला आणि विधानसभेला किती मतदान झाले, याविषयीचा आढावा घेतला. अपयशाची कारणे काय? याविषयी माहिती घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते लक्ष देत नाहीत, उमेदवार लादले जातात. शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. त्याचबरोबर आमचे विचार नेत्यांनी लक्षात घ्यावेत, अशी मते व्यक्त केली.

कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी व्यक्त

पिंपरी चिंचवड कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पिंपरी, चिंचवड आणि मावळ, भोसरी या चारही मतदारसंघांमध्ये शिवसेनेची ताकद चांगली होती. मात्र, या जागांसाठी आम्ही मागणी केली होती. मात्र, एकही जागा नेत्यांनी दिली नाही, याबद्दल कार्यकर्ते तीव्र नाराज आहेत, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर राऊत यांनी मार्गदर्शन केले. राऊत म्हणाले, लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली आहे. आता महापालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सजग राहायला हवे.

शिरूर लोकसभा स्वबळावर

राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष उमेदवार ठरवतात. मात्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण सुचवाल, त्याच व्यक्तीला उमेदवारी देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली राहील. आगामी २०२९ ला होणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या वतीने स्वबळावर लढविण्यात येईल, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागावे.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतShirurशिरुरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024