शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:02 IST

मागील काही वर्षांमध्ये मावळ तालुक्यात माहिती अधिकार कायद्याचा वापर मोठा वाढला असून, बहुतेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संख्याही वाढत आहे.

कामशेत - मागील काही वर्षांमध्ये मावळ तालुक्यात माहिती अधिकार कायद्याचा वापर मोठा वाढला असून, बहुतेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे संख्याही वाढत आहे. या आरटीआय कार्यकर्त्यांकडून मागविण्यात येणारी माहिती पुरवता पुरवता प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुरतीच दमछाक होत आहे. त्यामुळेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळवलेल्या माहितीचा खरंच समाजाच्या, शहराच्या व गावाच्या विकासासाठी उपयोग होत आहे का असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेसह आता नागरिकांनाही पडला आहे.मावळ तालुक्यातील तहसील कार्यालयापासून ते पंचायत समिती व तालुक्यातील विविध ग्रामपंचायत व इतर अनेक प्रशासकीय विभागांमध्ये आरटीआय कार्यकर्त्यांचा दबदबा वाढत असून प्रशासकीय सेवेत काम करणाºया अधिकाºयांवर त्यांचा वचक निर्माण झाला आहे. तालुक्याच्या ठिकाणी या आरटीआय कार्यकर्त्यांचा रोजचा राबता असून नागरिकांची जागेची अथवा इतर अनेक प्रकारची प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रशासकीय अधिकाºयांवर दबाव टाकणे, अधिकाºयाने संबंधित कामास अनुमती न दिल्यास माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागवणे, संबंधित अधिकारी काम करीत नसेल तर त्याच्या चुका शोधून त्याची माहिती माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागणे आदी अनेक प्रकार काही वर्षांपासून मावळात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही भ्रष्ट अधिकारी यांच्या जाळ्यात अडकून अथवा त्यांना कोंडीत पकडून स्वत: चा आर्थिक लाभ करून घेणाºया आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये वाढ झाली आहे. माहिती अधिकार कायद्याचा मावळात मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागला असल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकारीही करू लागले आहेत.यातूनच मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या भीतीपोटी ग्रामविकास अधिकारी बदली करून घेण्यास कचरत आहे.मात्र, मागील काही वर्षांमध्ये काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यवसाय मांडला असल्याची तक्रार खुद्द नागरिकच करू लागले आहेत. एखाद्या विषयासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे अर्ज करायचा, मिळालेल्या माहितीतील चुका व दोष पाहून संबंधित प्रशासकीय अधिकारी व इतर यांना कोंडीत पकडून यांच्याकडे पैशांची मागणी करायची आदी प्रकार सुरू झाले आहेत. दहावीपर्यंतही शिक्षण न झालेले आरटीआय कार्यकर्ते झाले असून, एखाद्या विषया संदर्भात माहिती मागवून आर्थिक लाभासाठी प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करीत असल्याचे आरोप तालुक्यातील विविध ग्रामपंचायत प्रशासन व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी करू लागले आहेत. तर गावच्या ग्रामसभांमध्ये तर या कार्यकर्त्यांचीच चलती असते.अधिकारी म्हणतात : प्रशासकीय यंत्रणेचा वेळ वायामाहिती अधिकार कायद्याचा अनेक आरटीआय कार्यकर्ते चांगल्या उद्देशाने वापर करीत आहेत. मात्र काही जन वाईट व स्वार्थी भावनेने या कायद्याचा वापर करीत असून यात प्रशासकीय यंत्रणेचा वेळ वाया जात आहे. हा कायदा खूप चांगला आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला अडचणी निर्माण होत आहेत.- रणजित देसाई,तहसीलदार, मावळमाहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिक व इतरांनी विचारलेली माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, एखादी माहिती मागताना समाजाच्या, गावाच्या विकासासाठी असेल तर मागावी कारण माहिती पुरवण्यात शासकीय अधिकाºयांचा निष्कारण वेळ वाया जातो व त्याचा फायदा समाजासाठीही होत नाही.- अप्पासाहेब गुजर, प्रभारी गट विकास अधिकारी, मावळशहराच्या गावाच्या विकासासाठी व भ्रष्ट प्रशासकीय अधिकाºयांवर जरब बसवण्यासाठी सर्वच स्तरांवर अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्यामुळे गावाच्या शहराच्या महसुलात भर तर पडतच आहे. शिवाय प्रशासनाचा कारभारही सुरळीत राहत आहे. या आरटीआय कार्यकर्त्यांमुळे विधायक कामांसह गावांच्या, शहरांच्या विकासात भर पडली आहे.

टॅग्स :RTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताPuneपुणे