शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

शक्ती जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याणासाठी हवी- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:24 PM

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह बोलत होते...

पिंपरी : जीवनात ज्ञानास जेवढे महत्व आहे, तेवढेच संस्कारांना आहे. जीवनमुल्यांशी आपण नेहमी कटीबद्ध असायला हवे. आपली जीवनमुल्ये व्यक्तीमत्व घडवित असतात. शिक्षण, अध्यात्म, संस्कारच देशाला पुढे नेतील. भारताला जगदगुरूंचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ज्ञान, धन संपत्तीबरोबरच व्यक्तीमत्व विकासाकडे लक्ष घ्यायला हवे. त्यातूनच शक्तीवान, ज्ञानवान, धनवान बनू शकणार आहोत, आपली शक्ती  जगाला घाबरविण्यासाठी नव्हे, जगद्कल्याण भावनेने प्रेरीत असायला हवी, असे मत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पिंपरी येथे शुक्रवारी व्यक्त केले.

तरूणांची जाणीव समृद्धज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचे जीवन घडविण्यासाठी असणारे महत्व, मनसंस्कार, मनस्वास्थ यावर मार्गदर्शन करताना महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दाखले देऊन तरूणांची जाणीव समृद्ध केली. ज्ञान आणि तत्वज्ञानाचे दाखले आणि किस्से सांगितले. त्यास टाळ्यांचा कडकडाट देऊन तरूणाईने दाद दिली.

राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजेजीवनात शिक्षण, ज्ञान, संस्कार महत्वाचे आहे. शिक्षणाचा परिणाम व्यक्तिमत्त्व घडण्यास होत असतो. ओसामा बिन लादेन अरबपती, खरबपती होता. मात्र, त्याने ज्ञानाचा दुरुपयोग केला. दुसरीकडे पेपर विक्रेता असणारे ए.पी.जे अब्दुल कलाम हे शास्त्रज्ञ झाले, पुढे देशाचे राष्ट्रपती झाले. देशाला विकास पथावर नेण्यास योगदान दिले. दोन व्यक्तींचा विचार केल्यास शिक्षण आणि संस्कार याचा हा परिणाम आहे, राजकारणात असतानाही संतुलन ठेवले पाहिजे. ते अध्यात्माने येते, असेही राजनाथ सिंह म्हणाले.स्वदेशी २ ची हाकराजनाथसिंह म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. आपल्या गरजांसाठी दुसऱ्या देशांवर भारत आता अवलंबून राहू इच्छित नाही. त्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'ची हाक पंतप्रधानांनी दिली आहे. स्वदेशी-२ हा त्याच योजनेचा भाग आहे. स्वदेशीची पहिली हाक याच पुण्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांनी दिली होती. विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगात नव्या संकल्पना आणण्यावर भर द्यावा.’’

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पुणे यांच्या १३ व्या पदवीदान समारंभात संरक्षण मंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती  डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री  पाटील, कुलगुरू  डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव  विश्वस्त व कोषाध्यक्ष  डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योगपती व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, उद्योजक प्रतापराव पवार यांना डी.लिट आणि दत्ता मेघे इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूरचे  प्र-कुलपती  डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर आॅफ सायन्स (डी.एससी) ही मानद पदवी देऊन गौरविले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRajnath Singhराजनाथ सिंह