शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

दर्जेदार फळे चांगली किंमत मिळण्यासाठी परदेशात अन् उरलेली आमच्या ताटात

By हणमंत पाटील | Updated: April 7, 2023 16:39 IST

स्थानिक बाजारपेठेत फळांची विक्री करणे शेतकरी व उत्पादकांना परवडत नाही

पिंपरी : हवामानाच्या लहरीपणामुळे फळांचे उत्पादन कमी होऊन भाववाढ झाली आहे. तरीही चांग़ल्या दर्जाची फळेबाजारात दिसत नाही. ही दर्जेदार फळे चांगली किंमत मिळण्यासाठी परदेशात पाठविली जातात. उलट स्थानिक बाजारपेठेत उर्वरित फळे विक्रीसाठी जातात. कमी भावात शेतमाल व फळेखरेदीच्या ग्राहकांच्या मानसिकतेने कमी दर्जाची फळे आमच्या ताटात येत आहेत.

१०० रुपयांची द्राक्षे...

युरोपला निर्यात होणारी द्राक्षे ९० ते ११० रुपये किलोने उत्पादकांकडून व्यापारी खरेदी करतात. याचा अर्थ त्याहून अधिक किमतीला हीच द्राक्षे निर्यात होतात. मात्र, निर्यात करून शिल्लक राहिलेली द्राक्षे ३० ते ५० रुपये किलोने स्थानिक बाजारपेठेत विकली जातात.

हापूस १२०० रुपयांना...

निर्यातक्षप हापूस उत्पादन केले जाते. मात्र, केवळ १० ते २० टक्के हापूसच निर्यातक्षम तयार होतो. त्याला डझनाला डॉलर व परदेशी चलनाप्रमाणे बाराशे ते दीड हजार रुपयांचा भाव मिळतो. उर्वरित ८० टक्के हापूस व केशर हा स्थानिक बाजारपेठेत ५०० ते १००० रुपये डझनाला विकला जातो.

३०० रुपयांचे सफरचंद

सध्या काश्मीरची सफरचंदे स्थानिक बाजारपेठेत १०० ते २०० रुपयांपर्यंत मिळतात. तरीही ग्राहकांची ती खूप महाग असल्याची तक्रार असते. यापैकी दर्जेदार सफरचंदे परदेशांत निर्यात होतात. तेव्हा त्यांचा भाव किमान दुप्पट ते तिप्पट होतो.

हीच फळे महाग, एक्स्पोर्टची कशी परवडतील?

सध्या फळांचे उत्पादन कमी असल्याने केळी, चिकू, द्राक्ष, आंबा, सफरचंद ही फळे महाग आहेत; तर निर्यात होणाऱ्या दर्जेदार फळांच्या किमती किमान दुप्पट ते तिप्पट असतात. त्यामुळे ही महागडे फळे विकत घेऊन खाण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये अजून तयार झालेली दिसत नाही.

अशी फळे जातात परदेशात ?

परदेशात जाणाऱ्या फळांना कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. त्यासाठी काही मानांकने ठरविलेली असतात. प्रयोगशाळेचे सर्टिफिकेशन झाल्यानंतर तपासणी होऊन ही फळे परदेशात जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत चांगली व सेंद्रीय फळे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ही फळे ऑनलाईन अथवा मॉलमध्ये खरेदी करण्याची मानसिकता आणि जनजागृती वाढू लागली आहे, अशी माहिती राज्य पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

“गेल्या १० वर्षांत खते, औषधे व मंजुरीच्या किमती पाच ते सहा पटीने वाढल्या. मात्र, दहा वर्षांपूर्वी द्राक्ष, आंबा, चिकू व केळीच्या भावात त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत फळांची विक्री करणे शेतकरी व उत्पादकांना परवडत नाही. हॉटेलमध्ये नाष्टा व जेवणासाठी हजाराचे बिल आणि वरती टीप देणारे ग्राहक आहेत. परंतु, हेच ग्राहक बाजारपेठेत १० रुपयांच्या भाजीपाला गड्डीसाठी आणि ५० ते १०० रुपये किलोच्या फळांसाठी घासाघीस करीत राहतात. ही मानसिकता बदलली, तर निर्यातीची फळेसुध्दा स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे शेतक-यांना परवडेल.” - मधुकर कांगणे, संचालक, शेतकरी व उत्पादक कंपनी, सिन्नर, जि. नाशिक.

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेMarketबाजारMangoआंबाSocialसामाजिकMONEYपैसा