शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

दर्जेदार फळे चांगली किंमत मिळण्यासाठी परदेशात अन् उरलेली आमच्या ताटात

By हणमंत पाटील | Updated: April 7, 2023 16:39 IST

स्थानिक बाजारपेठेत फळांची विक्री करणे शेतकरी व उत्पादकांना परवडत नाही

पिंपरी : हवामानाच्या लहरीपणामुळे फळांचे उत्पादन कमी होऊन भाववाढ झाली आहे. तरीही चांग़ल्या दर्जाची फळेबाजारात दिसत नाही. ही दर्जेदार फळे चांगली किंमत मिळण्यासाठी परदेशात पाठविली जातात. उलट स्थानिक बाजारपेठेत उर्वरित फळे विक्रीसाठी जातात. कमी भावात शेतमाल व फळेखरेदीच्या ग्राहकांच्या मानसिकतेने कमी दर्जाची फळे आमच्या ताटात येत आहेत.

१०० रुपयांची द्राक्षे...

युरोपला निर्यात होणारी द्राक्षे ९० ते ११० रुपये किलोने उत्पादकांकडून व्यापारी खरेदी करतात. याचा अर्थ त्याहून अधिक किमतीला हीच द्राक्षे निर्यात होतात. मात्र, निर्यात करून शिल्लक राहिलेली द्राक्षे ३० ते ५० रुपये किलोने स्थानिक बाजारपेठेत विकली जातात.

हापूस १२०० रुपयांना...

निर्यातक्षप हापूस उत्पादन केले जाते. मात्र, केवळ १० ते २० टक्के हापूसच निर्यातक्षम तयार होतो. त्याला डझनाला डॉलर व परदेशी चलनाप्रमाणे बाराशे ते दीड हजार रुपयांचा भाव मिळतो. उर्वरित ८० टक्के हापूस व केशर हा स्थानिक बाजारपेठेत ५०० ते १००० रुपये डझनाला विकला जातो.

३०० रुपयांचे सफरचंद

सध्या काश्मीरची सफरचंदे स्थानिक बाजारपेठेत १०० ते २०० रुपयांपर्यंत मिळतात. तरीही ग्राहकांची ती खूप महाग असल्याची तक्रार असते. यापैकी दर्जेदार सफरचंदे परदेशांत निर्यात होतात. तेव्हा त्यांचा भाव किमान दुप्पट ते तिप्पट होतो.

हीच फळे महाग, एक्स्पोर्टची कशी परवडतील?

सध्या फळांचे उत्पादन कमी असल्याने केळी, चिकू, द्राक्ष, आंबा, सफरचंद ही फळे महाग आहेत; तर निर्यात होणाऱ्या दर्जेदार फळांच्या किमती किमान दुप्पट ते तिप्पट असतात. त्यामुळे ही महागडे फळे विकत घेऊन खाण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये अजून तयार झालेली दिसत नाही.

अशी फळे जातात परदेशात ?

परदेशात जाणाऱ्या फळांना कीटकनाशक व रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. त्यासाठी काही मानांकने ठरविलेली असतात. प्रयोगशाळेचे सर्टिफिकेशन झाल्यानंतर तपासणी होऊन ही फळे परदेशात जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत चांगली व सेंद्रीय फळे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ही फळे ऑनलाईन अथवा मॉलमध्ये खरेदी करण्याची मानसिकता आणि जनजागृती वाढू लागली आहे, अशी माहिती राज्य पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

“गेल्या १० वर्षांत खते, औषधे व मंजुरीच्या किमती पाच ते सहा पटीने वाढल्या. मात्र, दहा वर्षांपूर्वी द्राक्ष, आंबा, चिकू व केळीच्या भावात त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत फळांची विक्री करणे शेतकरी व उत्पादकांना परवडत नाही. हॉटेलमध्ये नाष्टा व जेवणासाठी हजाराचे बिल आणि वरती टीप देणारे ग्राहक आहेत. परंतु, हेच ग्राहक बाजारपेठेत १० रुपयांच्या भाजीपाला गड्डीसाठी आणि ५० ते १०० रुपये किलोच्या फळांसाठी घासाघीस करीत राहतात. ही मानसिकता बदलली, तर निर्यातीची फळेसुध्दा स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे शेतक-यांना परवडेल.” - मधुकर कांगणे, संचालक, शेतकरी व उत्पादक कंपनी, सिन्नर, जि. नाशिक.

टॅग्स :PuneपुणेfruitsफळेMarketबाजारMangoआंबाSocialसामाजिकMONEYपैसा