शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:43 IST

सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे.

चिंचवड : सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे. गल्लीबोळात सुरू झालेल्या या व्यवसायाचे बाजारीकरण झाले असून, या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्षण पद्धतीचे बाजारीकरण झाल्याने विद्यार्थ्यांची गळचेपी होत असून, पालक भरडले जात आहेत. यामुळे शालेय शिक्षण पद्धतीची घसरण होत असून, खासगी शिकवणीचा धंदा सध्या तेजीत आहे.पूर्वीच्या काळी शिकवणी ही चैन वाटत होती. केवळ श्रीमंतांचीच मुले शिकवणी लावत असत. मात्र साधारणपणे अवघड जाणाऱ्या विषयांना शिकवणी लावण्याची पद्धत होती. आता शिकवणीची पद्धत एवढी वाढली आहे की, पूर्वीच्या काळी कोणी शिकवणी न लावता शिकत होते असे म्हटले तर तरुण पिढीला आश्चर्य वाटते. सध्या शिकवणी शाळेइतकीच महत्त्वाची झाली आहे. पूर्वी गणित आणि इंग्रजी या विषयांची शिकवणी लावलेली असे. कारण इंग्रजी मुळातच अवघड वाटते आणि गणिताला सरावाची गरज असते. पण आता मराठी, हिंदी, भूगोल, विज्ञान याही विषयांना अगदी चौथीपासून शिकवणी लावलेली असते. पूर्वी शाळेच्या मुलांना शिकवण्या लावल्या जात, पण आता कॉलेजच्या मुुलांना सुद्धा शिकवण्या लावल्या जातात. पदवीधर झालेल्या मुलांनी नोकºया मागत फिरण्यापेक्षा शिकवणी वर्ग सुरू करून नोकरीपेक्षा अधिक कमाई सुरू केली आहे.त्यासाठी विशेष भांडवल लागत नसल्याने घरात अथवा एखाद्या छोट्याशा गाळ्यातही अशा प्रकारचे व्यवसाय थाटले जात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पंचवीस ते पन्नास हजारांपर्यंत फी आकारली जात असून, मराठी माध्यमासाठी बारा ते तीस हजारांपर्यंत फी घेतली जात आहे. शिक्षण पद्धती पालकांच्या लक्षात येत नाही.शाळेच्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ मिळताच मुलांना शिकवणीसाठी पाठविले जात असल्याने मुलांचे मैदानी खेळ बंद होत आहेत. काही नामांकित क्लास वर्षभर अगोदर मुलांची नावनोंदणी करून घेत आहेत. मुलांना येथे प्रवेश मिळावा यासाठी पालकही अशा ठिकाणी पैसे भरून प्रवेश निश्चित करत आहेत. दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थी कोणत्या क्लासचे आहेत हे दर्शविण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. पालक अशा पद्धतीला भुलत असल्याने हे व्यावसायिक मनमानी पद्धतीने पैसे घेत आहेत. शालेय शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याने खासगी शिकवणीचा व्यवसाय सध्या जोमात आहे. अशा व्यवसायावर काही निर्बंध लावण्याची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत आहे.खासगी शिकवणीत एका वेळी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. दिवसभरात पाच ते सहा तास विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात. विशिष्ट विषयाच्या शिक्षणासाठी वेगवेगळी फी घेतली जात आहे. यासाठी काही विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. काही शाळांतील शिक्षक वेगवेगळ्या भागात जाऊन शिकवणी घेत आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी