शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:03 IST

भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी

पिंपरी : जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे आणि जातीयवादाचे विष पेरण्याचे काम देशात सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे. त्यामुळे सातवर्षात विघातक राजकारण सुरू आहे, देशाची घटना बदलण्याचे काम काही लोक करीत आहेत, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पिंपरीत गुरूवारी केली.

पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने भारत जोडो यात्रेबाबत प्रबोधन करण्यासाठी रथ तयार केले आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात प्रबोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने खराळवाडीत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते पाटील बोलत होते. 

सतेज पाटील म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी केली आहे. धर्माच्या नावाने प्रश्न निर्माण करून त्यात तेल ओतण्याचे काम भाजपा करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महागाई बेरोजगारीने कळस गाठला असताना मूळ प्रश्नांपासून भरकटविण्याचे काम केले जात आहे.डाळ, तेलाचे, गॅसचे दर गगणाला भिडलेत. सामान्यांच्या डोक्यावर महागाई मारण्याचे काम केले आहे. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना जातीयवाद वाढविण्याचे काम केले जात आहे. जाती धर्माचे राजकारण केले जात आहे, ही बाब हानीकारक आहे. बंधूभाव धोक्यात येत आहे. माणुसकीधर्म वाढविण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे.’’

टॅग्स :PuneपुणेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलPoliticsराजकारणInflationमहागाईcongressकाँग्रेसBJPभाजपा