शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

जाती धर्माचे राजकारण केलं जातंय, ही बाब हानीकारक; सतेज पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 09:03 IST

भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी

पिंपरी : जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे आणि जातीयवादाचे विष पेरण्याचे काम देशात सुरू आहे. महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे. त्यामुळे सातवर्षात विघातक राजकारण सुरू आहे, देशाची घटना बदलण्याचे काम काही लोक करीत आहेत, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पिंपरीत गुरूवारी केली.

पिंपरी-चिंचवड काँग्रेस समितीच्या वतीने भारत जोडो यात्रेबाबत प्रबोधन करण्यासाठी रथ तयार केले आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात प्रबोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने खराळवाडीत झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे नेते पाटील बोलत होते. 

सतेज पाटील म्हणाले, ‘‘भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचविण्यासाठी, महागाईला थांबविण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि युवकांच्या रोजगारसाठी केली आहे. धर्माच्या नावाने प्रश्न निर्माण करून त्यात तेल ओतण्याचे काम भाजपा करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महागाई बेरोजगारीने कळस गाठला असताना मूळ प्रश्नांपासून भरकटविण्याचे काम केले जात आहे.डाळ, तेलाचे, गॅसचे दर गगणाला भिडलेत. सामान्यांच्या डोक्यावर महागाई मारण्याचे काम केले आहे. सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना जातीयवाद वाढविण्याचे काम केले जात आहे. जाती धर्माचे राजकारण केले जात आहे, ही बाब हानीकारक आहे. बंधूभाव धोक्यात येत आहे. माणुसकीधर्म वाढविण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे.’’

टॅग्स :PuneपुणेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलPoliticsराजकारणInflationमहागाईcongressकाँग्रेसBJPभाजपा