शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पवना नदी पुन्हा प्रदूषित; थेरगाव केजुदेवी बंधारा पुन्हा फेसाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:32 IST

- स्थानिक नागरिकांकडून संताप, रसायन मिश्रित सांडपाणी आणी जलपर्णीचा विळखा, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

हिंजवडी : थेर गावातून खळखळून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली. नदी पात्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्रच फेसाळले आहे. वारंवार येथील नदीपात्र फेसाळत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.प्रदूषित होणाऱ्या नदी पात्राबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. शुक्रवारी (दि. २१) केजुदेवी धरण परिसरात पवना नदी पात्र पूर्ण फेसाळले होते. नदीची झालेली दुरवस्था आणी पसरलेल्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, मागील अनेक महिने केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला रसायन मिश्रित सांडपाणी आणी जलपर्णीचा विळखा पडला होता. त्यामुळे, नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्याने परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.सध्या पवना नदी जलपर्णी मुक्त झाली मात्र, धरण परिसरात वारंवार रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्र फेसाळत आहे. त्यामुळे, जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, मानवी आरोग्यासह पर्यावरणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केजुदेवी धरण परिसरात पवना नदी वारंवार का प्रदूषित होत आहे? याची सखोल चौकशी करून, कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रriverनदी