शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भामा आसखेड जलवाहिनीच्या ठेकेदाराची झाडाझडती; काळ्या यादीत का टाकू नये? : महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:04 IST

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणात १६७ एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे.

पिंपरी : शहराला भामा आसखेड धरणातूनपाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाची गती कमी आहे. चार वर्षांची मुदत संपली, तरी काम अपूर्णच आहे. केवळ ४८ टक्के झाले असल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ठेकेदाराची झाडाझडती घेत तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणात १६७ एमएलडी पाण्याचा कोटा राखीव करण्यात आला आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ऑफशोअर इंडिया या ठेकेदाराला दिले. नवलाख उंबरेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे संपूर्ण काम १६२ कोटी रुपयांचे आहे. काम सुरू करण्याचा आदेश १५ डिसेंबर २०२० रोजी दिला होता. कामाची मुदत १५ डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची होती. मात्र, या मुदतीत १९ किलोमीटरपैकी केवळ नऊ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.सोमवारी (दि. १६) जलवाहिनीचा ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रभारी कार्यकारी अभियंता दीपक पाटील, सल्लागार आदी अधिकाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी बैठक घेतली. कामाच्या संथ गतीवरून नाराजी व्यक्त करीत ठेकेदाराची झाडाझडती घेतली. कामासाठी दिलेली चार वर्षांची मुदत संपली आहे, त्यामुळे तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, असा इशारा दिला. आंद्रा धरणाच्या कामाला अद्याप प्रारंभ नाहीदरम्यान, आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंबरे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. या मार्गात साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. सध्या इंद्रायणी नदीतून निघोजे बंधाऱ्यातून महापालिका ८० एमएलडी पाणी उचलत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीDamधरणPuneपुणे