हिंजवडी : माण गावातील मुख्य ओढ्याला पूर आल्याने कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ठाकर वस्ती, धुमाळ वस्ती, हिंगडे वस्ती यांचा गावठाणाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बंधाऱ्याजवळच्या घरांना पुराचा फटका बसला असून, कुंभार व्यावसयिकांचे पत्राशेड आणि कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे.
ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रस्ता बंद झाला आहे. बाजूलाच असलेल्या पत्राशेडमध्ये पाणी शिरल्याने कामासाठी लागणारी माती वाहून गेली आहे. काही मूर्तीसुद्धा वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. - बाळू कुंभार, व्यावसायिक माण