शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी मानवी साखळी, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:53 IST

प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवा निगडीपासून सुरू करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. याला शहरातील विविध संस्थांच्या सभासदांनी हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सेवा निगडीपासून सुरू करावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टिंग एनजीओच्या अंतर्गत शुक्रवारी निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. याला शहरातील विविध संस्थांच्या सभासदांनी हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला.मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून, मार्ग पिंपरीपर्यंतच आणण्यात येणार आहे. निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बसगाड्या क्षमतेपेक्षा जास्त भरून जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवासस्थाने, शहरातील पर्यटनस्थळे, वाहतूक नगरी व अन्य महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे, असे फोरमच्या सभासदांचे म्हणणे आहे.या मानवी साखळीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. यामध्ये पोलीस नागरिक मित्र, ज्येष्ठ नागरिक संघ, सिद्धिविनायक नगरी, संस्कार प्रतिष्ठान, रोटरी क्लब आॅफ चिंचवड मोरया, सावरकर मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पतंजली योग समिती, सुप्रभात मित्र परिवार ग्रुप दुर्गा टेकडी, नवयुग शैक्षणिक व साहित्य मंडळ निगडी-प्राधिकरण, भावसार व्हिजन, निगडी प्राधिकरण रेसिडन्स फोरम, ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी-चिंचवड, घरकुल फेडरेशन, ग्राहक पंचायत, रोटरी क्लब आॅफ निगडी, लायन्स क्लब पुणे निगडी, रेडझोन संघर्ष समिती, जलदिंडी, सांगली जिल्हा मित्र मंडळ प्रतिष्ठान इत्यादी संघटनांचे सभासद उपस्थित होते.‘पुणे मेट्रो निगडीपासून सुरू व्हावी’ अशा मागणीचे फलक नागरिकांनी हातात घेतले होते. केवळ फलकांच्या माध्यमातून जनजागृती करत कसलीही निदर्शने अथवा घोषणा न देता शांततेच्या मार्गाने ही मानवी साखळी काढण्यात आली. पुणे मेट्रो पहिल्या फेजमध्ये निगडीपर्यंत पोहोचली, तरच पिंपरी-चिंचवड शहराला पूर्णपणे न्याय मिळणार आहे. गर्दीचा आणि त्रासाचा प्रवास सुखकर करण्याची हीच खरी वेळ आहे, अशा प्रकारचे संदेश फलकाच्या माध्यमातून या वेळी देण्यात आले.