शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची पिंपरी महापालिकेला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:26 IST

महापालिकेचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश सक्षम प्राधिकरणास का देण्यात येऊ नये..

ठळक मुद्दे४७ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी पवना, मुळा  आणि सोडले जाते इंद्रायणी नदीत नदीतील मासे मरण्याचे प्रकार वषार्तून दोनदा झाल्याचे निदर्शनास जलचर प्राण्यांची जीवितहानी पाहता पर्यावरणास हानी

पिंपरी : महापालिकेच्या बेपर्वाईमुळे नदीचे पर्यावरण बिघडत आहे. महापालिकेने विनाप्रक्रीया सांडपाणी नदीत सोडणे तातडीने थांबवावे, सांडपाणी प्रक्रियेबाबत कृती आराखडा सादर करावा, महापालिकेचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश सक्षम प्राधिकरणास का देण्यात येऊ नये, असे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.पवनेतील प्रदूषणामुळे माशांचा मृत्यू झाला होता. याबाबत 'लोकमत' ने प्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत माजी खासदार गजानन बाबर यांनीही महामंडळास पत्रव्यवहार केला होता. गेल्या महिन्यात थेरगाव केजूबाई बंधारा येथे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची तक्रार राहुल सरोदे यांनी केल्यावर एमपीसीबी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ताथवडे स्मशानभुमीजवळील नदीपात्रात कासव मृतावस्थेत आढळले. नदीत चार ठिकाणांहून विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी  मिसळत असल्याचे आढळून आले.सांडपाण्यावर प्रक्रियेकडे दुर्लक्ष  महापालिका सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करत नसल्याने नदीतील मासे मरण्याचे प्रकार वषार्तून दोनदा झाल्याचे निदर्शनास आले. रावेत मैलाशुद्धीकरण केंद्राची अवस्था दयनीय झाली आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी गढूळ, हिरवट रंगाचे आढळले. या सर्व तपशीलांचा, निरीक्षणांचा विचार करता महामंडळाने महापालिकेला नोटीस दिली होती. महापालिकेने नियमांचे उल्लंघन केले आहे. जलचर प्राण्यांची जीवितहानी पाहता पर्यावरणास हानी पोहोचवली आहे. असा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. वीज मंडळाला आदेश देऊन वीजपुरवठा तर पाटबंधारे विभागाला आदेश देऊन पाणीपुरठा खंडीत करण्यास का बजावू नये ?, महापालिकेच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करू नये, अशी थेट विचारणा केली आहे. महापालिकेने विनाप्रक्रीया केलेले पाणी पवना नदीत सोडणे तातडीने थांबवावे. नदीप्रदुषण रोखण्याबाबतचा कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे आदेशही महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.   गजानन बाबर म्हणाले,महापालिका पवना नदीतून दररोज ५२० एमएलडी पाणी उचलते. तर, केवळ ३१२ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रीया करते. ४७ एमएलडी विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी पवना, मुळा  आणि इंद्रायणी नदीत सोडले जाते. पुरेशी सांडपाणी वाहू नलिका आणि मैलाशुद्धीकरण केंद्रांच्या अभावामुळे दुषित पाणी नद्यांमध्ये मिसळत आहे. नद्यांचे मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदुषण झाले आहे. जलपर्णी वाढली आहे.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरण