शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रोजलॅन्ड रेसिडन्सी सोसायटीला भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 23:39 IST

पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड : पिंपळे सौदागर येथील रोजलॅन्ड रेसिडन्सी या सोसायटीला रहिवासी भागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २ आॅक्टोबरला दिल्ली येथे होणा-या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या शहरविकास मंत्रालयातर्फे सोसायटी सदस्यांना हा पुरस्कार स्विकारण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले आहे.याविषयी रोजलॅन्ड रेसिडन्सी सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर म्हणाले की, भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोसायटीमध्ये स्वच्छता करण्यासाठी प्लॅस्टीक व ई-वेस्ट गोळा करण्यास सुरुवात केली. पुढे आम्ही ओला कचरा, पालापाचोळा गोळा करुन त्यापासून खत निर्मिती सुरु केली. यामध्ये २० ते २५ कुटुंबे आता घरच्या घरी खत निर्मिती करतात.सोसायटीतर्फे अन्य सदस्यांनाही खत निर्मितीसाठी मार्गदर्शन केले जाते. यानुसार सोसायटीमध्ये तीन महिन्याला एक टन खत निर्मिती होते. हे खत सध्या सोसायटीच्या बागेतच वापरले जाते. मात्र खत निर्मिती पाहता राज्य सरकारने इतर काही संस्थानाही खत विकण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. हा जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आहे. यासाठी सिद्धार्थ नाईक, आनंद दप्तरकर व सोसायटीची व्यवस्थापकीय समिती आणि सोसायटीच्या रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले.केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत मोहिमे'त सक्रिय सहभाग नोंदवत पिंपरी चिंचवड मधील रोजलँड रेसिडन्सिने 'आपले घर' ही संकल्पना राबविली. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शर्वरी रानडे आणि अंजली मस्कर यांच्या संकल्पनेतून एक व्हिडीओ देखील बनविण्यात आला आहे. रोजलँड रेसिडेन्सीने कच-याचे वर्गीकरण करण्यावर भर दिला आहे. ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा अशा प्रकारे कचºयाचे वर्गीकरण केले जाते. ओल्या कच-याचे घरच्या घरीच कंपोस्ट खत बनविण्यात येते. पालापाचोळा किंवा नैसर्गिक सुका कचरा झाडांच्या बुंध्याला टाकून तसेच खतनिर्मिती करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. तर ई-कचरा कमिन्स इंडिया कंपनीला दिला जातो. स्वच्छतेच्या उपक्रमांमुळे सध्या सोसायटीमधून जाणारा कचरा ३०-४० टक्क्यांनी घटला आहे. २ आॅक्टोबर, २०१८ पर्यंत सोसायटीमधून कोणत्याही प्रकारचा कचरा बाहेर जाऊ न देता सर्व कच-याचे व्यवस्थापन करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे.