शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:39 IST

- शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका

पिंपरी : शहरात महायुतीचे, सत्ताधारी पक्षाचे पाच आमदार आहेत. मात्र, अर्थसंकल्पात पिंपरी- चिंचवड शहराला ठेंगा मिळाला आहे. शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भोसरीतून भाजपचे आमदार महेश लांडगे, चिंचवड येथून भाजपचे आमदार शंकर जगताप, पिंपरीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे असे एकूण पाच आमदार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पवना नदी सुधार प्रकल्प, मेट्रोचा विस्तारित मार्ग, उद्योग, शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. नवीन योजनेत शहराचा समावेश असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, एकाही प्रकल्पाला निधी मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पांना निधी मिळण्याची होती अपेक्षा

मेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी हा प्रकल्पाचे काम सुरू आहे. निगडी ते किवळे मुकाई चौक आणि मुकाई चौक ते वाकड, वाकड ते नाशिक फाटा आणि नाशिक फाटा ते चाकण असे चार मेट्रोचे मार्ग प्रस्तावित आहेत. शहरातून निगडी ते दापोडी हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यासाठी निधी आणि कामगार रुग्णालय विस्तार, पवना नदी सुधार प्रकल्पास तरतूद होण्याची अपेक्षा होती. मात्र, एकाही प्रकल्पास निधी नाही.

उद्योगांना ठेंगा

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी आहे. या औद्योगिक नगरीतील विकासाला चालना देण्यासाठी निधी किंवा योजना मिळण्याची अपेक्षा होती. तसेच कर सवलत आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनांनी पाठपुरावा केला होता. मात्र, अर्थसंकल्पात उद्योगांसाठी काहीही नसल्याचे दिसून आले. तसेच उद्योगांसाठी राज्य शासनाचा कोणताही नवीन प्रकल्प जाहीर झाला नाही.

अजितदादांचे प्रेम झाले कमी..!

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अशा तीनही जबाबदाऱ्या अजित पवार सांभाळत आहेत. पिंपरी-चिंचवड हे अजितदादांचे आवडते शहर. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अजितदादांचे शहरावरील प्रेम कमी झाले आहे, अशीही टीका होऊ लागली आहे.

या अर्थसंकल्पामध्ये विकास कामांच्या केवळ मोठमोठ्या घोषणाच केलेल्या दिसून येतात. जवळपास एक लाख कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार. या संदर्भातले स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांना देता आले नाही. वाहनांवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यामुळे वाहनांच्या किमती वाढतील, त्याचा विपरीत परिणाम उद्योगधंद्यांवर होण्याची शक्यता आहे. थोडक्यात अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ असे त्याचे वर्णन करावे लागेल. - मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेBudgetअर्थसंकल्प 2024Ajit Pawarअजित पवारPuneपुणे