शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर'

By विश्वास मोरे | Updated: July 4, 2024 19:17 IST

नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते

पिंपरी : मावळपासून आळंदीपर्यंत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आळंदीतील सिद्धबेट येथे गुरुवारी एल्गार आंदोलन केले. स्थानिक नागरिक, वारकरी, विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेत, टाळ मृदंग वाजवत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर' केला.  

पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी अक्षरशः फेसाळलेली आहे. तेलकट तवंग दररोज पाण्यावर पसरलेला असतो. याबाबत स्थानिक प्रशासनापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करूनही तोडगा निघालेला नाही. नुकतीच आषाढी पालखी वारी आळंदीतून निघाली. या वारी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रदूषित इंद्रायणीचे फेसाळलेले पाणी ' आचमन' करावे लागले. यामुळे वारकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या. या भावना सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना कळाव्यात. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

आळंदीतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शना करीता भाविक ही येत असतात. तसेच ते इंद्रायणी काठी येऊन पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान करतात तसेच पवित्र जल आचमन करतात. त्यामुळे नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते. जलप्रदूषणा मुळे नदी काठच्या गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम  होत आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात इंद्रायणी जलप्रदूषणामुळे केळगावातील नागरिकांना अशुद्ध (काळसर रंग) पाण्याचा पुरवठा झाला होता. स्नान करण्यासाठी सुद्धा अयोग्य असा पाणी पुरवठा त्यावेळी झाला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे जलप्रदूषण रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली नाही त्याला शासन जबाबदार आहेत.  तसेच या जलप्रदूषणा वर आळा बसण्यासाठी जलप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्कता आहे.

 पिंपरी चिंचवड शहरातून इंद्रायणी नदी वाहते. म्हणून दरवर्षी जलपर्णी काढणे , नाल्यांची सफाई, ट्रीटमेंट प्लांट, रिव्हर सायक्लोथॉन अशी दुकानदारी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या सुरू आहे. सत्ताधारी भाजपने या दुकानदारीच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. इंद्रायणी नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच इंद्रायणीची आज गटारगंगा झाली आहे . या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी आंदोलनात करण्यात आली.

आळंदीतील वारकरी काय म्हणतात

- माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले वर्षभर इंद्रायणी नदीचे पाणी स्वच्छ राहील.  आणि पुढील ४८ तासात इंद्रायणी चे पाणी स्वच्छ दिसेल पण अजून पाणी अस्वच्छ दिसत आहे.- करोडो रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जर आमच्या वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान असलेल्या इंद्रायणी मातेला मोकळा श्वास मिळत नसेल तर नक्की हा पैसा जातो कुठे? याचे उत्तर आता मिळाले पाहिजे.- नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नमामि इंद्रायणी चे खोटे गाजत किती दिवस दाखवणार आहेत.  - नदीच्या काठावर काही ठिकाणी भराव टाकण्यात आले आहेत. अनेकांची हॉटेल इंद्रायणी काठी आहेत त्याचे सांडपाणी व मैला मिश्रित पाणी येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेindrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा