शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची एटीएम बॅटऱ्यांवर वक्रदृष्टी, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:50 IST

पैसे, युपीएसच्या चोरीनंतर चोरट्यांची आता एटीएममधील बॅट-यांकडे वक्रदृष्टी झाली आहे. मागील दोन महिन्यात चोरट्यांनी चार ठिकाणी बॅट-यांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शहरातील एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भोसरी : पैसे, युपीएसच्या चोरीनंतर चोरट्यांची आता एटीएममधील बॅटºयांकडे वक्रदृष्टी झाली आहे. मागील दोन महिन्यात चोरट्यांनी चार ठिकाणी बॅट-यांवर डल्ला मारला आहे. त्यामुळे शहरातील एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सांगवी व पिंपळे गुरवमध्ये चार विविध ठिकाणच्या आणि विविध बँकांच्या एटीएममधून बॅटºयांची चोरी करत चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. सांगवीतील सृष्टी चौक येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर, रामकृष्ण मंगल कार्यालय-त्रिमूर्ती चौक, पिंपळे गुरव आणि जुनी सांगवी या परिसरातील बँक आॅफ इंडिया बँकेचे तीन एटीएम सेंटरमधील १६ बॅटºया व २ युपीएस १६ फेब्रुवारी रोजी चोरल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणातील चोरट्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेरबंद केले. मात्र, अन्य तीन घटनांमधील चोरट्यांच्या शोधात पोलीस असतानाच एचडीएफसी बँकेच्या पिंपळे निलखमधील विशालनगर येथील एटीएममधील सहा बॅटºया चोरट्याने चोरून नेल्याची घटना उजेडात आली. त्यामुळे एटीएम केंद्रांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एका एटीएम सेंटरमध्ये सुमारे चार ते सहा बॅटरी संच लावलेले असतात. एटीएम सेंटरमध्ये वापरण्यात येणाºया बॅटरी भंगारात विकल्यास त्याची चांगली किंमत मिळते. त्यामुळे या बॅटरी चोरण्यासाठी शहरात अशा भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढल्याची ग्राहकांमध्ये चर्चा आहे. एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असले, तरी त्यांचा उपयोग केवळ नावापुरता किंवा दिखाव्यासाठी होत असल्याचे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. त्यातच शहरातील बहुतांश एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नाहीत. काही एटीएमचे दरवाजे तुटलेले आहेत. पिंपरी कॅम्पात चक्क किरकोळ वस्तू विक्रीच्या दोन दुकानांमध्ये एटीएम मशिन बसवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या एटीएम कार्ड गोपनियता व सुरक्षितताही वाºयावर असल्याचे पहायला मिळत आहे. बहुसंख्य एटीएममध्ये दोन मशिन आहेत. त्याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने एकावेळी अनेक ग्राहक आत शिरतात. त्याचा गैरफायदा चोरटे उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक तैनात करणे आवश्यक आहे. संबंधित सुरक्षारक्षक सक्षम आणि प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षक नसल्याचा गैैरफायदा चोरटे घेतात. या प्रकारांना आळा बसला पाहिजे. त्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.सुरक्षारक्षक नाहीत प्रशिक्षित, सक्षमशहरातील बहुसंख्य एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षकांचा अभाव जाणवतो. ज्याठिकाणी सुरक्षारक्षक दिसतात त्यांच्याकडे स्वत:च्याच सुरक्षेची कोणतीही साधने दिसत नाहीत. केवळ ड्रेसकोडवरच सुरक्षारक्षकांचे अस्तित्व आहे. सुरक्षारक्षकांची शरीरयष्टी पाहून यांनाच सुरक्षेची गरज असल्याचे निदर्शनास येते. स्वसंरक्षणाचे अथवा सुरक्षारक्षक म्हणून कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना बँकांकडून सुरक्षारक्षक नावालाच एटीएमच्या देखरेखीसाठी ठेवले जात आहेत. त्यामुळे यापूर्वीही सुरक्षारक्षकाला धाक दाखवून अथवा मारहाण करून एटीएम लुटीच्या घटना घडल्या आहेत. प्रशिक्षित आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम तसेच सशस्त्र सुरक्षारक्षकांचीच नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची मागणीअस्वच्छतेबरोबरच मोकाट कुत्र्यांसाठीही एटीएम सेंटर मुक्कामाचे ठिकाणी बनू लागले आहे. संत तुकारामनगर परिसरात एटीएम सेंटरच्या समोरील पायºया तसेच कट्ट्यावर टवाळखोर ठाण मांडून बसलेले असतात. वातानुकूलित एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक खुर्ची मांडून बसलेले असल्याचे दिसून येतात. सेंटर बाहेर सुरक्षेसाठी तैनात राहण्याऐवजी सेंटरमध्ये ग्राहक पैसे काढत असतानाही सुरक्षारक्षकाची असलेली उपस्थिती त्रासदायक ठरत आहे. विशेष म्हणजे महिला वर्गाला अधिकच संकोच होतो. एटीएममधील बॅटºयाही सुरक्षित नसतील तर पैशांचे काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत असून एटीएमच्या सुरक्षिततेकडे बँकांनी लक्ष पुरविण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड