शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तब्बल ५० वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय; ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 13:24 IST

पवना धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा, यासाठी ५० वर्षे लढा सुरू होता

वडगाव मावळ : तब्बल ५० वर्षे लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय मिळाला आहे. धरणात जागा गेलेल्या ७६४ खातेदारांना प्रत्येकी चार एकर जमीन परत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पवना धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा, यासाठी ५० वर्षे लढा सुरू होता. बुधवारी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आ. सुनील शेळके, अधिकारी व धरणग्रस्त शेतकऱ्यांची संयुक्त बैठक झाली. पवना धरणग्रस्त संयुक्त समितीचे अध्यक्ष नारायण बोडके, संजय खैरे, बाळासाहेब मोहोळ, लक्ष्मण काळे, मुकुंदराज काऊर, संतोष कडू, दत्तात्रय ठाकर, रामभाऊ कालेकर यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप करण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. दोन एकर जागा धरण परिसरात देण्यात येणार असून, उर्वरित दोन एकर जागा पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी देण्यात येणार आहे. एकूण ७६४ खातेदारांना सुमारे १,८३९ एकर क्षेत्रापैकी १,५२८ क्षेत्र पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे. सुमारे ३११ एकर क्षेत्र रस्ते, ओढे, नाले, वने व धरण सुरक्षेकरिता राखीव ठेवले जाणार आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, परंतु ते खातेदार नाहीत, त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यांनी सर्व माहिती व कागदपत्रांसह पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रस्ताव आठ दिवसांत पुनर्वसन विभागाकडे मंत्रालय स्तरावर पुढील आठ दिवसांत सादर करावा, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले आहेत. प्रस्ताव मिळाल्यानंतर पुढील आठ दिवसांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पवना धरणासाठी मावळातील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. १९६५ मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आणि १९७२ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पातील काही बाधित खातेदारांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु उर्वरित खातेदार प्रतीक्षेत होते. अखेर बुधवारच्या बैठकीत पुनर्वसन मंत्र्यांनी निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि शेतकऱ्यांसोबत घेतलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. -सुनील शेळके, आमदार, मावळ

बैठकीत झालेले निर्णय

१. पवना धरणग्रस्तांतील प्रत्येक खातेदाराला चार एकर क्षेत्र वाटप होणार.२. दोन एकर क्षेत्र धरण परिसरात, तर दोन एकर क्षेत्र जिल्ह्याच्या इतर ठिकाणी.३. एकूण ७६४ खातेदारांना सुमारे १८३९ एकरपैकी १५२८ एकर क्षेत्र पहिल्या टप्प्यात देणार.४. ज्या शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत; परंतु ते खातेदार नाहीत, त्यांनाही समाविष्ट केले जाणार.

टॅग्स :PuneपुणेVadgaon Mavalवडगाव मावळDamधरणRainपाऊसWaterपाणी