शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:31 IST

वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे...

- विश्वास मोरे

पिंपरी :इंद्रायणी नदीच्या तीरावर भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यावर संत तुकाराम महाराजांनी कळस चढविला. पर्यावरणाचे महत्त्व वारकरी संतांनी सांगितले. मात्र, देहूगाव ते आळंदीपर्यंतच्या नदी मार्गावर नागरीकरण वाढले आहे. महापालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींचे मैला शुद्धिकरणाचे प्रकल्प अपयशी ठरल्याने अजूनही सांडपाणी थेट नाल्यामधून इंद्रायणीत मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे.

आषाढीवारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देहू-आळंदीतून आलेला भक्तीचा प्रवाह थेट चंद्रभागेशी एकरूप होतो. मात्र, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आषाढीवारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची माई असणाऱ्या इंद्रायणी नदीची ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी पाहणी केली. त्यातून इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले.

गावांतील सांडपाणी थेट नदीत

देहूगाव : देहूगावची लोकसंख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. तर गावातील मैला सांडपाणी आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या टाकल्या आहेत. तर मैलापाणी प्रक्रिया करण्यासाठी गायराणवर मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले आहे. त्याची दुपारी पाहणी केली असता, तो बंद होता. तर हा प्रकल्प सकाळी सुरू असल्याचे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले. गावातील दोन नाल्यांतील पाणी थेट नदीत जाताना दिसून आले. तसेच येलवाडी आणि इतर गावांतील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले.

मैलाशुद्धीकरण केंद्र १०० टक्के नाही कार्यान्वित ...

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीवर चिखलीत १६ दशलक्ष लिटरचे दोन शुद्धिकरण केंद्र व चऱ्होलीतील चाळीस दशलक्ष लिटरचा एक आणि वीस दशलक्ष लिटरचा एक असे दोन एसटीपी प्लांट आहेत. त्यांचे पाणी १०० टक्के प्रक्रिया होत नसल्याचे दिसून आले. शहरात सिंटेल बंधारा, तळवडे-चाकण रस्ता, तळवडे स्मशान भूमी, चिखली माई पूल, शेलारवस्ती तळवडे, मोशी टोलनाका, सस्तेवस्ती बंधारा, डुडुळगाव स्मशानभूमी, आळंदी आणि चऱ्होली स्मशानभूमी येथील नाल्यांतील सांडपाणी थेट नदीत जात आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणdehuदेहूAlandiआळंदीvarkariवारकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड