शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

तीर्थरूपी इंद्रायणीची झाली गटार; महापालिका, पर्यावरण विभाग आणि शासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 13:31 IST

वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे...

- विश्वास मोरे

पिंपरी :इंद्रायणी नदीच्या तीरावर भागवत धर्मातील वारकरी संप्रदायातील मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यावर संत तुकाराम महाराजांनी कळस चढविला. पर्यावरणाचे महत्त्व वारकरी संतांनी सांगितले. मात्र, देहूगाव ते आळंदीपर्यंतच्या नदी मार्गावर नागरीकरण वाढले आहे. महापालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतींचे मैला शुद्धिकरणाचे प्रकल्प अपयशी ठरल्याने अजूनही सांडपाणी थेट नाल्यामधून इंद्रायणीत मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची गंगा असणारी तीर्थरुपी इंद्रायणी आता गटारगंगा झाली आहे.

आषाढीवारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देहू-आळंदीतून आलेला भक्तीचा प्रवाह थेट चंद्रभागेशी एकरूप होतो. मात्र, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आषाढीवारीच्या निमित्ताने वारकऱ्यांची माई असणाऱ्या इंद्रायणी नदीची ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी पाहणी केली. त्यातून इंद्रायणी नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले.

गावांतील सांडपाणी थेट नदीत

देहूगाव : देहूगावची लोकसंख्या चाळीस हजारांच्या आसपास आहे. तर गावातील मैला सांडपाणी आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी वाहिन्या टाकल्या आहेत. तर मैलापाणी प्रक्रिया करण्यासाठी गायराणवर मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले आहे. त्याची दुपारी पाहणी केली असता, तो बंद होता. तर हा प्रकल्प सकाळी सुरू असल्याचे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले. गावातील दोन नाल्यांतील पाणी थेट नदीत जाताना दिसून आले. तसेच येलवाडी आणि इतर गावांतील सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले.

मैलाशुद्धीकरण केंद्र १०० टक्के नाही कार्यान्वित ...

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इंद्रायणी नदीवर चिखलीत १६ दशलक्ष लिटरचे दोन शुद्धिकरण केंद्र व चऱ्होलीतील चाळीस दशलक्ष लिटरचा एक आणि वीस दशलक्ष लिटरचा एक असे दोन एसटीपी प्लांट आहेत. त्यांचे पाणी १०० टक्के प्रक्रिया होत नसल्याचे दिसून आले. शहरात सिंटेल बंधारा, तळवडे-चाकण रस्ता, तळवडे स्मशान भूमी, चिखली माई पूल, शेलारवस्ती तळवडे, मोशी टोलनाका, सस्तेवस्ती बंधारा, डुडुळगाव स्मशानभूमी, आळंदी आणि चऱ्होली स्मशानभूमी येथील नाल्यांतील सांडपाणी थेट नदीत जात आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणwater pollutionजल प्रदूषणdehuदेहूAlandiआळंदीvarkariवारकरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड