शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली वाढ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:13 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले.

तळेगाव दाभाडे - केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले. शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. कर्जमाफी झाली नाही. उलट शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. यापुढे भाजपा आणि मित्रपक्षाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.येथील मारुती मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार परिवर्तन सभा घेण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दत्ता साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अर्चना घारे, रोहित पवार, हेमलता काळोखे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, दीपक हुलावळे, सुनील भोंगाडे, कैलास गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, शोभा कदम, विजय पाळेकर, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, सुभाष जाधव, दत्तात्रय पडवळ, आशिष खांडगे, सुनीता काळोखे, शबनम खान, सुवर्णा राऊत, उपस्थित होते़ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, घोटाळ्यात भाजपाने ५५० कोटीचे राफेल विमान १६५० कोटींना खरेदी केले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीच तयार नाही. काळा पैसा आणू असे म्हणणारे बँकांना गंडा घालून परदेशात गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. आश्वासनांची खैरात करणारे भाजपा सरकार सर्वच बाबतीत फेल गेले आहे. ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार दीपक हुलावळे यांनी मानले.हायपरलूप प्रकल्प : नागरिकांची दिशाभूलविकासाच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान केली जाणारी बुलेट ट्रेन किंवा पुणे ते मुंबई दरम्यानचा हायपरलूप प्रकल्प असेल हा कोणाचा तरी स्वप्नातील प्रकल्प असून त्याला जनतेचा विरोध आहे. शेतकºयांच्या जमिनी याद्वारे कवडीमोल दराने सरकार ताब्यात घेत आहे. ज्याला वेगाने अल्पावधीत एखाद्या ठिकाणी जावयाचे असेल तर त्याकरिता विमान सेवा उपलब्ध आहे. हायपरलूप प्रकल्प जगात कुठे यशस्वी झाला नाही़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन्ही प्रकल्पांना विरोध आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.स्थानिक आमदार, खासदारांचे अपयशबापूसाहेब भेगडे म्हणाले, स्थानिक खासदार आणि आमदारांना तालुक्याचे प्रश्न सोडविण्यास अपयश आले आहे. केंद्र आणि राज्य शासन घेत असलेले निर्णय लोकहिताचे नाहीत. सरकार खोटारडे आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. हे शासन थापाडे आहे. मावळ तालुक्यातील कारखाने खेड तालुक्यात गेले, याला जबाबदार सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना हेच आहेत. प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी