शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली वाढ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:13 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले.

तळेगाव दाभाडे - केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले. शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. कर्जमाफी झाली नाही. उलट शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. यापुढे भाजपा आणि मित्रपक्षाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.येथील मारुती मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार परिवर्तन सभा घेण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दत्ता साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अर्चना घारे, रोहित पवार, हेमलता काळोखे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, दीपक हुलावळे, सुनील भोंगाडे, कैलास गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, शोभा कदम, विजय पाळेकर, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, सुभाष जाधव, दत्तात्रय पडवळ, आशिष खांडगे, सुनीता काळोखे, शबनम खान, सुवर्णा राऊत, उपस्थित होते़ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, घोटाळ्यात भाजपाने ५५० कोटीचे राफेल विमान १६५० कोटींना खरेदी केले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीच तयार नाही. काळा पैसा आणू असे म्हणणारे बँकांना गंडा घालून परदेशात गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. आश्वासनांची खैरात करणारे भाजपा सरकार सर्वच बाबतीत फेल गेले आहे. ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार दीपक हुलावळे यांनी मानले.हायपरलूप प्रकल्प : नागरिकांची दिशाभूलविकासाच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान केली जाणारी बुलेट ट्रेन किंवा पुणे ते मुंबई दरम्यानचा हायपरलूप प्रकल्प असेल हा कोणाचा तरी स्वप्नातील प्रकल्प असून त्याला जनतेचा विरोध आहे. शेतकºयांच्या जमिनी याद्वारे कवडीमोल दराने सरकार ताब्यात घेत आहे. ज्याला वेगाने अल्पावधीत एखाद्या ठिकाणी जावयाचे असेल तर त्याकरिता विमान सेवा उपलब्ध आहे. हायपरलूप प्रकल्प जगात कुठे यशस्वी झाला नाही़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन्ही प्रकल्पांना विरोध आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.स्थानिक आमदार, खासदारांचे अपयशबापूसाहेब भेगडे म्हणाले, स्थानिक खासदार आणि आमदारांना तालुक्याचे प्रश्न सोडविण्यास अपयश आले आहे. केंद्र आणि राज्य शासन घेत असलेले निर्णय लोकहिताचे नाहीत. सरकार खोटारडे आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. हे शासन थापाडे आहे. मावळ तालुक्यातील कारखाने खेड तालुक्यात गेले, याला जबाबदार सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना हेच आहेत. प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी