शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली वाढ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 02:13 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले.

तळेगाव दाभाडे - केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले. शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. कर्जमाफी झाली नाही. उलट शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. यापुढे भाजपा आणि मित्रपक्षाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.येथील मारुती मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार परिवर्तन सभा घेण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दत्ता साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अर्चना घारे, रोहित पवार, हेमलता काळोखे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, दीपक हुलावळे, सुनील भोंगाडे, कैलास गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, शोभा कदम, विजय पाळेकर, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, सुभाष जाधव, दत्तात्रय पडवळ, आशिष खांडगे, सुनीता काळोखे, शबनम खान, सुवर्णा राऊत, उपस्थित होते़ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, घोटाळ्यात भाजपाने ५५० कोटीचे राफेल विमान १६५० कोटींना खरेदी केले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीच तयार नाही. काळा पैसा आणू असे म्हणणारे बँकांना गंडा घालून परदेशात गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. आश्वासनांची खैरात करणारे भाजपा सरकार सर्वच बाबतीत फेल गेले आहे. ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार दीपक हुलावळे यांनी मानले.हायपरलूप प्रकल्प : नागरिकांची दिशाभूलविकासाच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान केली जाणारी बुलेट ट्रेन किंवा पुणे ते मुंबई दरम्यानचा हायपरलूप प्रकल्प असेल हा कोणाचा तरी स्वप्नातील प्रकल्प असून त्याला जनतेचा विरोध आहे. शेतकºयांच्या जमिनी याद्वारे कवडीमोल दराने सरकार ताब्यात घेत आहे. ज्याला वेगाने अल्पावधीत एखाद्या ठिकाणी जावयाचे असेल तर त्याकरिता विमान सेवा उपलब्ध आहे. हायपरलूप प्रकल्प जगात कुठे यशस्वी झाला नाही़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन्ही प्रकल्पांना विरोध आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.स्थानिक आमदार, खासदारांचे अपयशबापूसाहेब भेगडे म्हणाले, स्थानिक खासदार आणि आमदारांना तालुक्याचे प्रश्न सोडविण्यास अपयश आले आहे. केंद्र आणि राज्य शासन घेत असलेले निर्णय लोकहिताचे नाहीत. सरकार खोटारडे आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. हे शासन थापाडे आहे. मावळ तालुक्यातील कारखाने खेड तालुक्यात गेले, याला जबाबदार सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना हेच आहेत. प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी