शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, तर पिंपरीत ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर का नाही? संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 17:36 IST

स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची ईडीकडे तक्रार करणार

पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड दौरे वाढले आहे. या दौऱ्यांमध्ये महापालिका निवडणुकांच्या रणनीती ठरविण्याचे प्रयत्न देखील सुरु आहे. सध्या भाजपच्या हातात असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 

शिवसेना संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आकुर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.राऊत म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक २०२२ ला होणार आहे. आणि महापालिकांच्या निवडणुकीतील आघाडीबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ५५ नगरसेवक करण्याचे टार्गेट आहे.’’ ५५ जागांवर शिवसेनेचा महापौर होणार का? या प्रश्नावर ‘‘५६ जागांवर मुख्यमंत्री होऊ शकतो, मग ५५ जागांवर पिंपरीत शिवसेनेचा महापौर का नाही असे राऊत म्हणाले. 

औद्योगिकनगरीत गेल्या साडेचार वर्षात भय आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही. याउलट जास्त वाढताना दिसत आहे. भय, भ्रष्टाचारमुक्त ही सगळी ठेकेदारीची रिंग आहे. शहरातील आमदारांसह इथले सगळे प्रमुख लोक महापालिकेतील ठेकेदारीमध्ये गुंतलेत. महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. भ्रष्टाराची  प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांचे कुटूंबीय संचालक असलेल्या स्मार्ट सिटीतील कंपनीच्या  घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे  तक्रार करणार आहे, असा आरोप शिवसेना संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.  

खासदार राऊत म्हणाले, ‘‘महापालिकेत जनतेच्या पैशांची लूट झाली आहे. भाजपच्या मुंबईत बसलेल्या प्रमुख नेत्यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. दुस-यांवर जसे बोलतात. तसे यावर बोलणे देखील गरजेचे आहे. त्यांना स्वत:वरील टीका सहन होत नाही. ’’..............................राज्य सरकार तपास करीत नाहीराऊत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीची कामे घेणा-या कंपनीत कोणाचे कुटुंबीय संचालक आहेत. याबाबतची सगळी कागदपत्रे ईडीला पाठविणार आहोत. असे तपास हल्ली राज्य सरकार करत नाही. ईडी करते. ईडीकडे माहिती नसेल. तर, आम्ही पाठवून देवू, महापालिकेतील प्रकरणे आता बाहेर येत आहे. कोरोना काळात चौकशा केल्या नाहीत. आता प्रकरणे बाहेर येत असून चौकशा केल्या जातील. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यहार जनतेच्या पैशांची लूट सहन करणार नाहीत.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण