शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Pimpri Chinchwad: ...तर पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपातीचे संकट अटळ; पवना धरणात ३० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 20:00 IST

...शहरावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

पिंपरी : पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात शुक्रवारपर्यंत (दि. १४) उपयुक्त पाणीसाठा ३०.७५ टक्के होता. तो शंभर टक्के होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. धरणातील जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा विचार केला जातो. त्यानुसार उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत विसर्गाचे प्रमाण ठरविले जाते. जर आवश्यक पाऊस नाही झाला तर शहरावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पवना धरणातून दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. धरणापासून नदी पात्रातून आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून पाणी जलवाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होतो. सध्या २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. समान प्रमाणात सर्वांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन भागात विभाजन केले आहे. त्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण शहराला ५१० एमएलडी पाणीपुरवठा करण्याऐवजी निम्मे शहरालाच तेवढे पाणी दिले जात आहे. त्यामुळे शिवाय, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज ५० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे.

पाणीकपातीची आहे भीती...

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पहिल्या आठवड्यात अपेक्षित असणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. तेव्हापासून मावळातही दररोज पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर, एक ऑगस्टपासून आणखी पाणी कपातीचे नियोजन करावे लागेल, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

आंद्रात ४३.२३ टक्के साठा

आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणीकोटा शहरासाठी मंजूर आहे. त्याअंतर्गत चिखली येथे ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र महापालिकेने उभारले आहे. सद्यस्थितीत भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनी, जॅकवेल आदी कामे सुरू आहेत. आंद्रा धरणातून विसर्ग केलेले पाणी इंद्रायणी नदीतून शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी निघोजे येथील बंधाऱ्यातून दररोज ५० एमएलडी पाणी घेतले जात आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पातून पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे