शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: ...तर पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपातीचे संकट अटळ; पवना धरणात ३० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 20:00 IST

...शहरावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

पिंपरी : पवना धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे धरणात शुक्रवारपर्यंत (दि. १४) उपयुक्त पाणीसाठा ३०.७५ टक्के होता. तो शंभर टक्के होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. धरणातील जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याचा विचार केला जातो. त्यानुसार उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत विसर्गाचे प्रमाण ठरविले जाते. जर आवश्यक पाऊस नाही झाला तर शहरावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पवना धरणातून दररोज ५१० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा केला जातो. धरणापासून नदी पात्रातून आलेले पाणी रावेत येथील बंधाऱ्यातून उचलले जाते. तेथून पाणी जलवाहिन्यांद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेले जाते. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा होतो. सध्या २५ नोव्हेंबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. समान प्रमाणात सर्वांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन भागात विभाजन केले आहे. त्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण शहराला ५१० एमएलडी पाणीपुरवठा करण्याऐवजी निम्मे शहरालाच तेवढे पाणी दिले जात आहे. त्यामुळे शिवाय, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच, आंद्रा धरणातून दररोज ५० एमएलडी पाणी शहराला मिळत आहे.

पाणीकपातीची आहे भीती...

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पहिल्या आठवड्यात अपेक्षित असणारा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला. तेव्हापासून मावळातही दररोज पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर, एक ऑगस्टपासून आणखी पाणी कपातीचे नियोजन करावे लागेल, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

आंद्रात ४३.२३ टक्के साठा

आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणीकोटा शहरासाठी मंजूर आहे. त्याअंतर्गत चिखली येथे ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र महापालिकेने उभारले आहे. सद्यस्थितीत भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जलवाहिनी, जॅकवेल आदी कामे सुरू आहेत. आंद्रा धरणातून विसर्ग केलेले पाणी इंद्रायणी नदीतून शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी निघोजे येथील बंधाऱ्यातून दररोज ५० एमएलडी पाणी घेतले जात आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पातून पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे