शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘दोन दिवसात १२ लाख दिले नाही तर...' उद्योजकाचे अपहरण करून १ कोटींच्या खंडणीची मागणी

By नारायण बडगुजर | Updated: September 24, 2023 15:15 IST

खंडणी न दिल्यास उद्योजकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली

पिंपरी : उद्याजकाचे अपहरण करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास उद्योजकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. खेड तालुक्यातील शिरोली येथे गुरुवार (दि. २१) ते शनिवार (दि. २३) या कालावधीत ही घटना घडली.  

चाकण येथील एका उद्योजकाने याप्रकरणी शनिवारी (दि. २३) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आकाश विनायक भुरे (२२, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) याला अटक केली. त्याच्यासह शुभम सरोदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उद्योजक हे गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास आळंदी फाटा येथून चाकण येथे घरी जात होते. त्यावेळी आरोपी रिक्षातून आले. त्यांनी फिर्यादी उद्योजकाच्या गाडीला रिक्षा आडवी लावून फिर्यादीस अडवले. त्यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल फोन घेऊन त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून शिरोली येथील एका शेतात नेले. रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या कालावधीत त्यांना शेतात डांबून ठेवले.

‘तुझा मोठा व्यवसाय आहे. तुला आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील. तरच तुला सोडू नाहीतर तुझी व तुझ्या घरच्यांची गेम करू. उडवून टाकू’ असे म्हणत फिर्यादी उद्योजकाच्या पायावर शस्त्र ठेवून त्यांना धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी उद्योजकाच्या बॅगमधून जबरदस्तीने २० हजार रुपये काढून घेतले. ‘दोन दिवसात कमीत कमी १२ लाख रुपये दिले नाही तर तुला व तुझ्या घरच्यांना संपवून टाकू’ अशी धमकी देऊन फिर्यादी उद्योजकास सारा सिटी येथे दुचाकीवरून आणून सोडले. त्यानंतर वारंवार फोन करून पैशांची मागणी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकMONEYपैसाbusinessव्यवसाय