शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

हलगर्जीपणाने रखडला विकास, लोकप्रतिनिधींची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:45 AM

लोकप्रतिनिधींची टीका : सोसायटीमध्ये बैठक

पिंपरी : वीस वर्षांपूर्वी तयार केलेल्या शहर विकासाच्या आराखड्यांवर आत्ता काम करत आहोत. प्रत्येक काम वेळच्या वेळी झाले असते तर ही दुर्भाग्यपूर्ण वेळ आज आलीच नसती. यासाठी प्रशासकीय अधिका-यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली.

चिखली, मोशी परिसरातील रहिवासी सोसायट्यांमधील नागरिकांना येणा-या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपुढे मांडण्यासाठी चिखली मोशी हाउसिंग फेडरेशनच्या वतीने संवादाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी या भागातील महापालिका, पोलीस, वीज वितरण, सोसायट्यांच्या तक्रारी यांसारख्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.आमदार लांडगे म्हणाले, ‘‘सध्या आम्ही पुढील अनेक वर्षांचे नियोजन करीत आहोत. जाधववाडी, चिखली, मोशी, तळवडे या भागातील नागरिकांसाठी तीनशे एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. भामा-आसखेड धरणग्रस्तांना योग्य वेळी त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे ते शेतकरी त्या धरणातून पाणी उचलण्यासाठी विरोध करीत आहेत. या विरोधामुळे त्या धरणातून पाणी आणण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्या शेतक-यांना वेळीच मोबदला मिळाला असता तर आज विलंबाची ही वेळ आली नसती. पण त्यातूनही मार्ग काढत ज्याप्रमाणे पवना धरणाचे पाणी रावेत येथून उचलण्यात येते, त्याप्रमाणे भामा-आसखेड धरणाचे पाणी देहूरोड येथून उचलण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या मोहक जाहिराती पाहून नागरिकांनी फसू नये.’’४वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, ‘‘काही ठिकाणी रस्त्यावर दारू पिणारे नागरिक आढळून येत आहेत. त्यासाठी रिव्हर रेसिडेन्सी, मायमर सोसायटी यांसारख्या आतल्या सोसायट्यांपर्यंत पोलीस गस्त सुरु करण्यात येणार आहे. सोसायट्यांमध्ये तक्रार पेट्यांची संकल्पना राबविण्यात येत असून, त्यालादेखील नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन समस्यांसाठी आवाज उठवायला हवा.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे