शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

वर्चस्ववादातून भडकले टोळीयुद्ध, उद्योगनगरीत अशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:26 AM

वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात.

पिंपरी : वेगवेगळ्या नावांनी स्थापन झालेल्या स्थानिक गुंडांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून टोळीयुद्ध भडकत आहे. त्यांच्यात वारंवार अंतर्गत धुसफूस सुरू असते. विशिष्ट परिसरात आपली दहशत निर्माण करून ती टिकविण्यासाठी ते एकमेकांवर चाल करून जातात. वर्चस्व सिद्ध करण्याच्या मोहापायी एकमेकांच्या जिवावर उठण्यापर्यंत त्यांनी मजलमारली आहे.रावण टोळी आणि महाकाली टोळीच्या गुंडांमध्ये घडलेल्या चकमकीतून टोळीयुद्ध भडकल्याचे जाणवू लागले आहे. महाकाली टोळीतून बाहेर पडलेल्यांनी स्थापन केलेली रावण टोळी, या दोन टोळ्यांमधील वर्चस्ववादातून नुकताच आकुर्डीत खून झाला. या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न अनिकेतच्या टोळीतील गुंडांकडून होत आहे. त्यातून टोळीयुद्ध भडकल्याचे निदर्शनास येत आहे. चिंचवड (वेताळनगर), आनंदनगर, पिंपरी कॅम्प, भाटनगर, पिंपरीगाव, नेहरुनगर, गांधीनगर, विठ्ठलनगर, भोसरीतील बालाजीनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, दिघी, चºहोली, चिखली, रावेत, कासारवाडी, वाकड, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी आदी ठिकाणचे गुंड स्थानिक टोळ्यांमध्ये सक्रिय आहेत. या टोळ्या स्थानिक पातळीवर कार्यरत आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये तरुणांचे ग्रुप तयार होतात. तेच पुढे टोळ्यांशी संलग्न होत आहेत. त्या त्या परिसरातील गुंडांच्या टोळ्या तेथील नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे काम करतात. अनेकदा त्यांच्यातील अंतर्गत वादातून परिसरातील मोटारींची तोडफोड, जाळपोळ केली जाते. काही वेळा घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडवून आणले जातात. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. त्याचा या टोळ्यांमधील गुंड फायदा उठवितात.बेकायदा पिस्तूल बाळगणारे वेळोवेळी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून मोठ्या प्रमाणावर शहरात पिस्तूल आणले जात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील तरुणांकडे सहज पिस्तूल येत आहेत.विविध परिसरातील सुमारे ९० गुंडांवर तडीपारीची कारवाई झालेली आहे. पोलिसांकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जातात. मात्र, तरीही गुंडगिरीला आळा घालणे शक्य झालेले नाही. कामगार नेते प्रकाश चव्हाण, नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खुनी हल्ल्यांसाठी अशाच स्थानिक गुंडांच्या टोळ्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आलेले आहे. मोठ्या स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्यात या टोळ्यांचा सहभाग घेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांना मारण्याची सुपारी देण्यात आली. त्यातही अशाच गुंडांचा सहभाग घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड