शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फसव्या भाजपा सरकारची केवळ आश्वासने, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 01:20 IST

अच्छे दिन येणार असे आश्वासन देत भाजपा सरकारने सत्तेत येऊन साडेचार वर्षे पूर्ण केली. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे.

पिंपरी  - अच्छे दिन येणार असे आश्वासन देत भाजपा सरकारने सत्तेत येऊन साडेचार वर्षे पूर्ण केली. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. यापुढे भाजपाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.सांगवीतील पीडब्ल्यूडीच्या मैदानावर राष्टÑवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार सभा घेण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विलास लांडे, अण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, वर्षा जगताप आदी उपस्थित होत्या.या वेळी अजित पवार म्हणाले, भाजपा सरकारने जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवले. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. कर्जमाफी झाली नाही, शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत, इंधन दरवाढ केली, जीएसटी लागू करून उद्योजक, व्यावसायिकांपुढे अडचणी वाढवल्या, काळा पैसा बाहेर काढतो, असे सांगून नोटाबंदी केली, विविध समाज घटकांना आरक्षणाचे गाजर दाखवले. निवडून आल्यानंतर पहिल्याच सभेत धनगर समाजाला आरक्षण देणार, अशी घोषणा केली होती. सत्तेतील कालावधी संपुष्टात येण्याची वेळ आली तरी धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. सर्वच घटकातील नागरिक या सरकारवर नाराज आहेत. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे.अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इतर घटकाचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाविरोधात लढा देण्यासाठी त्यांच्यासह वंचित घटकाला बरोबर घेण्याची आमची भूमिका आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकºयांना दरमहा ५०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधूंना पाच हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. पाच राज्यांत पराभव झाल्यानंतर त्यांची अस्वस्थता जाणवू लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निर्धार मेळाव्यात भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासने काय दिली, त्या आश्वासनांची पूर्तता किती केली? हे त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आणि निवडणुकीनंतरच्या वक्तव्यावरून लक्षात येते. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील कोणीही सुखी झाला नाही. राफेल घोटाळा बाहेर आला. त्याबद्दल भाजपाचे कोणीच काही सांगत नाही. इंधन दरवाढ, महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते काय बोलले, निवडणुकीनंतर काय बोलत आहेत, याच्या व्हिडीओ क्लिप स्क्रिनवर दाखविण्यात आल्या.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, मी स्वत: भाजपाच्या १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. पुरावे सादर केले. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली. बेरोजगारी, महागाई यामुळे जनता संतापली आहे. बदल घडवून आणण्याची हीच वेळ आहे.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, राफेल घोटाळ्यात भाजपाने ५५० कोटींचे राफेल विमान १६५० कोटींना खरेदी केले. याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीच तयार नाही. काळा पैसा आणू असे म्हणणारे बँकांना गंडा घालून परदेशात गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. आश्वासनांची खैरात करणारे भाजपा सरकार सर्वच बाबतीत फेल गेले आहे. यामध्ये भाजपाचे जेवढे पाप आहे. तेवढेच पाप शिवसेनेचे आहे. न मागता सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्यावी, त्यांचे शैक्षणिक शुल्क सरकारने भरावे. १०० शहरे स्मार्ट सिटी करणारे चार शहरेसुद्धा स्मार्ट बनवू शकले नाहीत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड