शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

Video: पाण्यापासून वंचित! डोक्यावर बोचकं घेत महिला मुला, बाळांसह दलित कुटुंब निघाले मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:00 IST

पाण्यापासून वंचित ठेवलं जातं, घरात येऊन मारझोड केली जाते, स्थानिक स्तरावर न्याय मिळत नाही त्यामुळे न्यायासाठी दलित महिला पिंपरी चिंचवडहुन मंत्रालयात पायपीट करत निघाल्या

अश्विनी केदारी - जाधव 

पुणे: डोक्यावर असं बाचकं घेऊन ही महिला आपल्या कुटुंबासोबत पुण्यातील पिंपरी चिंचवड होऊन मुंबईकडे पायी चालत निघाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे. मूळचे थेरगावचे असणारे हे कुटुंब सध्या जुन्या पुणे मुंबई हायवे वरून पायी चालत मुंबईच्या दिशेने निघालेत आता ते पनवेलला पोहोचले. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी हे कुटुंबीय पायपीट करत मुंबईला निघालेत. स्थानिक स्तरावर आपल्याला न्याय मिळत नाहीये त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे, असं सांगत ही महिला मंत्रालयात निघाली. 

जातीवाचक शिव्या दिल्या जातात मारझोड केली जाते, घरात घुसून धमकावले जातं इतकच काय तर पिण्याचे पाणी तोडलं, शौचालय तोडलं, अनेक प्रकारचा अन्याय मागच्या काही दिवसांपासून आमच्यावर होतोय असा आरोप या महिलेने केलाय. आणि त्यासाठीच तीन बहिणी आणि एक लहान मुलगा आणि मुलगी हातात बॅनर घेऊन मुंबईच्या दिशेने पायपीट करतात. मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर, बाबासाहेबांनी दलितांसाठी चवदार तळे खुले केले. पण प्रशासनाने दलित कुटुंबाला 6 महिने पाण्यापासून वंचित ठेवले असा आरोपही केला आहे.

 पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी आमचे तक्रार घेतली जात नाही पोलिसांकडून मारझोड होते असा आरोप या महिलांनी केला असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी त्यांचे आरोप फेटाळल्याचे  समोर येत आहे.महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देत नसल्याने हे लोंढे कुटुंब आता मुंबईत मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांचे भेट घेणारे आणि तिथेही न्याय मिळाला तर ते दिल्ली गाठणार असल्याचं  त्यांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारpanvelपनवेलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजन