शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पिंपरीत जोरदार घोषणाबाजी करत काँंग्रेसची सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 17:39 IST

संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभागासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव मोदी-शहा यांनी आखला आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. 

ठळक मुद्देचाळीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी हुकूमशाही पध्दतीने देशाला वेठीस धरण्याचे काम सुरु

पिंपरी :केंद्रात सत्तांतर झाले तेव्हापासून मोदी - शहा या जोडगोळीने हुकूमशाही पध्दतीने कारभार चालवला आहे. संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभागासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव मोदी-शहा यांनी आखला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला.    राफेल भ्रष्टाचाराची चौकशी करणारे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा, विशेष संचालक राकेश आस्थाना या अधिका-यांवर कारवाई केली. त्याविरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी आकुर्डी येथील सीबीआय कार्यालयासमोर पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्यावेळी तांबे बोलत होते. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गिरीजा कुदळे, बिंदू तिवारी, प्रदेश सरचिटणीस अनिकेत म्हात्रे, मयुर जयस्वाल,शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे,अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते. गली गली में शोर है, चौकीदार चोर है या घोषणा देण्यात आल्या.     तांबे म्हणाले, राफेल विमान खरेदीमध्ये एचएएल या कंपनीला डावलून उद्योगपती अंबानींना कंत्राट दिले. यामध्ये चाळीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. सरकारचा घोटाळा जनतेसमोर येईल व पितळ उघडे पडेल याची भीती चौकीदारांना होती. म्हणूनच घटनेचा अनादर करीत एका रात्रीत वर्मा आणि आस्थाना यांची बेकायदा बदली केली.    सचिन साठे म्हणाले, राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी राफेल खरेदी तसेच या प्रकरणात मोदी-शहांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. तसेच सीबीआयचे वर्मा, आस्थाना यांच्यावर बेकायदापणे का कारवाई करताना घटना पायदळी तुडवली हे जनतेसमोर आणले आहे. हुकूमशाही पध्दतीने देशाला वेठीस धरले जात आहे. नि:पक्षपातीपणे काम करणा-या सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेवरदेखील आपला अंकुश पाहिजे या हेतूने चौकीदारांनी सर्वोच्च अधिका-यांच्या बदल्या केल्या जात आहे. त्यामुळे जगात भारताची प्रतिमा मलिन झाली.

टॅग्स :PuneपुणेRafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा