शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अंगणवाडी सेविकांचा निर्णय; शासनाने दिलेले 'सव्वा लाख' मोबाईल परत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:55 IST

अँप डाऊनलोड होत नाही अशा मोबाईलचे करायचे काय? सेविकांचा सवाल

ठळक मुद्देपिंपरीत मोबाईल जमा करत केले आंदोलन

पिंपरी : अंगणवाड्या डिजिटल करण्यासाठी अंगणवाडीताईंना शासनाने मोबाईल दिले. मात्र त्याचे स्टोरेज कमी असल्याने त्यात कामकाजासाठी आवश्यक ॲप्स डाऊनलोड होत नाहीत. अशा मोबाईलचे करायचे काय, असा सवाल करीत राज्यातील अंगणवाडीताईंनी शासनाने दिलेले सव्वा लाख मोबाईल परत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे बुधवारी पिंपरीगाव येथील प्रकल्प क्रमांक १ व विजय नगर येथील प्रकल्प दोनच्या कार्यालयात मोबाईल जमा करण्यात आले. सभेचे अध्यक्ष नितिन पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शैलजा चौधरी, अनिता आवळे, रीना कानडे, विद्या कुकरेजा, मंदा मोरे, अर्चना तोडकर, मीना आवंडे, नीना चासकर या प्रतिनिधींसह अंगणवाडीताई मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या. प्रकल्प अधिकाऱ्यांना या वेळी निवेदन तसेच हत्तीची प्रतिकृती देण्यात आली. 

बाल विकास प्रशासनाकडे मोबाईल परत केले जात असल्याचे निवेदन 

‘कॅस’ हा चांगल्या प्रकारे चाललेला ॲप बंद करून त्याऐवजी केंद्र शासनाने लादलेल्या पोषण ट्रॅकर या सदोष ॲप बाबतीतही सेविकांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पोषण ट्रकर न भरल्यास मानधन कपातीची धमकी दिली जात आहे. उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मूळ काम सहा मूलभूत सेवा देणे हे आहे. त्यांची पूर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ॲपमध्ये माहिती पाठवण्यात कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहारात कपात करणे अन्यायकारक ठरेल.

शासनाने दिलेल्या मोबाईलच्या दोषांची यादी संपणारी नाही. शासन -प्रशासनाकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अंगणवाडी सेविकांना दिलेले राज्यातील सव्वा लाख मोबाईल शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकात्मिक बाल विकास प्रशासनाकडे मोबाईल परत केले जात आहेत, असे निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारMobileमोबाइलSocialसामाजिकWomenमहिलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण