शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राज्यातील अंगणवाडी सेविकांचा निर्णय; शासनाने दिलेले 'सव्वा लाख' मोबाईल परत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:55 IST

अँप डाऊनलोड होत नाही अशा मोबाईलचे करायचे काय? सेविकांचा सवाल

ठळक मुद्देपिंपरीत मोबाईल जमा करत केले आंदोलन

पिंपरी : अंगणवाड्या डिजिटल करण्यासाठी अंगणवाडीताईंना शासनाने मोबाईल दिले. मात्र त्याचे स्टोरेज कमी असल्याने त्यात कामकाजासाठी आवश्यक ॲप्स डाऊनलोड होत नाहीत. अशा मोबाईलचे करायचे काय, असा सवाल करीत राज्यातील अंगणवाडीताईंनी शासनाने दिलेले सव्वा लाख मोबाईल परत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अंगणवाडी कर्मचारी सभेतर्फे बुधवारी पिंपरीगाव येथील प्रकल्प क्रमांक १ व विजय नगर येथील प्रकल्प दोनच्या कार्यालयात मोबाईल जमा करण्यात आले. सभेचे अध्यक्ष नितिन पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शैलजा चौधरी, अनिता आवळे, रीना कानडे, विद्या कुकरेजा, मंदा मोरे, अर्चना तोडकर, मीना आवंडे, नीना चासकर या प्रतिनिधींसह अंगणवाडीताई मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या. प्रकल्प अधिकाऱ्यांना या वेळी निवेदन तसेच हत्तीची प्रतिकृती देण्यात आली. 

बाल विकास प्रशासनाकडे मोबाईल परत केले जात असल्याचे निवेदन 

‘कॅस’ हा चांगल्या प्रकारे चाललेला ॲप बंद करून त्याऐवजी केंद्र शासनाने लादलेल्या पोषण ट्रॅकर या सदोष ॲप बाबतीतही सेविकांना अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पोषण ट्रकर न भरल्यास मानधन कपातीची धमकी दिली जात आहे. उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मूळ काम सहा मूलभूत सेवा देणे हे आहे. त्यांची पूर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ॲपमध्ये माहिती पाठवण्यात कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहारात कपात करणे अन्यायकारक ठरेल.

शासनाने दिलेल्या मोबाईलच्या दोषांची यादी संपणारी नाही. शासन -प्रशासनाकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने अंगणवाडी सेविकांना दिलेले राज्यातील सव्वा लाख मोबाईल शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकात्मिक बाल विकास प्रशासनाकडे मोबाईल परत केले जात आहेत, असे निवेदनात नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारMobileमोबाइलSocialसामाजिकWomenमहिलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण