शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांचा निकामी झालेल्या होडीतून धोकादायक प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 15:18 IST

पण या गावाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय पोट्ट्यांचा पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..

ठळक मुद्देइंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा

वडगाव मावळ : दोन गावांमधील '' त्यांचा '' शाळेचा, व्यवहाराचा असा प्रवास तीन पिढ्यांपासून आहे. पण या गावांचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय '' पोट्टे '' पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..यंदाही तसंच झालं...शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निकामी होडीतून जीवघेणा प्रवास करत सोमवारी शाळा गाठली. मावळ तालुक्यातील नाणोली व वराळे गावातील शेतकरी, महिला व विद्यार्थांची ही कहाणी.. इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यासाठी शासनाला जाग येईना तर नवीन होडी देण्यासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त मिळेना अशी परिस्थिती वर्षांनुवर्षे येथे कायम आहे. इंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या दीड हजार आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत  जाण्यासाठी होडीचा वापर करतात. गेल्या दोन वर्षांपासून या होडीचा अवस्था बिकट झाली आहे. तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे  होडीत पाणी येते. ते पाणी डब्याने बाहेर काढावे लागते. येथील शेतक-यांच्या जमिनी नाणोली चाकण येथे असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो.

मानधनाशिवाय नावाड्यांची तिसरी पिढी..

गावकऱ्यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटुंबीय उदानिर्वाह करत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरुवातीला दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यवसाय  सुरू केला.त्यानंतर मुलगा बळीराम आंणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थांची सेवा  आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतू सध्या महाखाईचे दिवस आहेत.त्यामुळे शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन द्यावे अशी मागणी बिबाबाई यांनी केली आहे. फुटलेल्या  होडीचा पत्रा पायाला  लागल्याने बिबाबाई जखमी झाली आहे. तरी देखील नाव ओढण्याचे काम करीत आहे. 

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता....

पावसाळ्यात अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो. आपत्कालीन व आणिबाणीच्या  परिस्थितीत प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पयार्यी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांनसाठी तातडीने  पर्याय व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. 

 

नविन पुलाचे कीती नारळ फुटणार ; मोठी दुर्घटना घडल्यावर शासनाला जाग येणार का ?

वराळे--नाणोली येथील इंद्राई नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी  ५० वषार्पूर्वी केली होती.१९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. परंतु   अध्याप पूल झाला नाही. निकामी झालेली होडी नविन मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे पाठ पुरावाही केला या बाबत गेल्यावर्षी १६ जूनला ''लोकमत'' मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर  शासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे. नविन होडी मिळावी  व पूलाचे काम सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरूण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंढे यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.  

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळriverनदीSchoolशाळाStudentविद्यार्थी