शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांचा निकामी झालेल्या होडीतून धोकादायक प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 15:18 IST

पण या गावाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय पोट्ट्यांचा पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..

ठळक मुद्देइंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा

वडगाव मावळ : दोन गावांमधील '' त्यांचा '' शाळेचा, व्यवहाराचा असा प्रवास तीन पिढ्यांपासून आहे. पण या गावांचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय '' पोट्टे '' पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..यंदाही तसंच झालं...शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निकामी होडीतून जीवघेणा प्रवास करत सोमवारी शाळा गाठली. मावळ तालुक्यातील नाणोली व वराळे गावातील शेतकरी, महिला व विद्यार्थांची ही कहाणी.. इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यासाठी शासनाला जाग येईना तर नवीन होडी देण्यासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त मिळेना अशी परिस्थिती वर्षांनुवर्षे येथे कायम आहे. इंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या दीड हजार आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत  जाण्यासाठी होडीचा वापर करतात. गेल्या दोन वर्षांपासून या होडीचा अवस्था बिकट झाली आहे. तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे  होडीत पाणी येते. ते पाणी डब्याने बाहेर काढावे लागते. येथील शेतक-यांच्या जमिनी नाणोली चाकण येथे असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो.

मानधनाशिवाय नावाड्यांची तिसरी पिढी..

गावकऱ्यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटुंबीय उदानिर्वाह करत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरुवातीला दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यवसाय  सुरू केला.त्यानंतर मुलगा बळीराम आंणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थांची सेवा  आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतू सध्या महाखाईचे दिवस आहेत.त्यामुळे शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन द्यावे अशी मागणी बिबाबाई यांनी केली आहे. फुटलेल्या  होडीचा पत्रा पायाला  लागल्याने बिबाबाई जखमी झाली आहे. तरी देखील नाव ओढण्याचे काम करीत आहे. 

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता....

पावसाळ्यात अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो. आपत्कालीन व आणिबाणीच्या  परिस्थितीत प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पयार्यी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांनसाठी तातडीने  पर्याय व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. 

 

नविन पुलाचे कीती नारळ फुटणार ; मोठी दुर्घटना घडल्यावर शासनाला जाग येणार का ?

वराळे--नाणोली येथील इंद्राई नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी  ५० वषार्पूर्वी केली होती.१९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. परंतु   अध्याप पूल झाला नाही. निकामी झालेली होडी नविन मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे पाठ पुरावाही केला या बाबत गेल्यावर्षी १६ जूनला ''लोकमत'' मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर  शासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे. नविन होडी मिळावी  व पूलाचे काम सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरूण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंढे यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.  

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळriverनदीSchoolशाळाStudentविद्यार्थी