शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थांचा निकामी झालेल्या होडीतून धोकादायक प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 15:18 IST

पण या गावाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय पोट्ट्यांचा पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..

ठळक मुद्देइंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा

वडगाव मावळ : दोन गावांमधील '' त्यांचा '' शाळेचा, व्यवहाराचा असा प्रवास तीन पिढ्यांपासून आहे. पण या गावांचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे बरं का..? ते म्हणजे दरवर्षी न चुकता या गावच्या शालेय '' पोट्टे '' पेपरमध्ये आणि टीव्हीवर झळकतात..यंदाही तसंच झालं...शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी निकामी होडीतून जीवघेणा प्रवास करत सोमवारी शाळा गाठली. मावळ तालुक्यातील नाणोली व वराळे गावातील शेतकरी, महिला व विद्यार्थांची ही कहाणी.. इंद्रायणी नदीवर पूल बांधण्यासाठी शासनाला जाग येईना तर नवीन होडी देण्यासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त मिळेना अशी परिस्थिती वर्षांनुवर्षे येथे कायम आहे. इंद्रायणीच्या अलीकडे-पलिकडे जाण्यासाठी होडी म्हणजे या दोन गावांना जोडणारी दुवा आहे. नाणोली गावची लोकसंख्या दीड हजार आहे. वराळे व तळेगावला जाण्यासाठी त्यांना जवळचा मार्ग म्हणून होडीचा प्रवास करावा लागतो. येथील मुले-मुली वराळे व इतर गावांतील शाळेत  जाण्यासाठी होडीचा वापर करतात. गेल्या दोन वर्षांपासून या होडीचा अवस्था बिकट झाली आहे. तळाला छिद्रे पडली आहेत.त्यामुळे  होडीत पाणी येते. ते पाणी डब्याने बाहेर काढावे लागते. येथील शेतक-यांच्या जमिनी नाणोली चाकण येथे असल्याने त्यांना सतत प्रवास करावा लागतो.

मानधनाशिवाय नावाड्यांची तिसरी पिढी..

गावकऱ्यांनी दिलेल्या बलुत्यावर तीन पिढ्यांपासून नावाड्यांचे कुटुंबीय उदानिर्वाह करत आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना झाडाच्या खोडाला तारा बांधल्या आहेत. त्या तारेच्या आधारे होडी ओढून नाव पुढे नेली जाते. सुरुवातीला दत्तोबा गव्हाणे यांनी होडीतून प्रवासाचा व्यवसाय  सुरू केला.त्यानंतर मुलगा बळीराम आंणि सून बिबाबाई याही हाच व्यवसाय करीत आहेत. या मोबदल्यात पैसे न घेता धान्य घेतात. ग्रामस्थांची व शालेय विद्यार्थांची सेवा  आमच्या हातून घडते हे आमचे भाग्य आहे.परंतू सध्या महाखाईचे दिवस आहेत.त्यामुळे शासनाने अथवा दोन्ही ग्रामपंचायतींनी मानधन द्यावे अशी मागणी बिबाबाई यांनी केली आहे. फुटलेल्या  होडीचा पत्रा पायाला  लागल्याने बिबाबाई जखमी झाली आहे. तरी देखील नाव ओढण्याचे काम करीत आहे. 

पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता....

पावसाळ्यात अचानक पाऊस वाढल्यास नदीला पूर येतो. आपत्कालीन व आणिबाणीच्या  परिस्थितीत प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पयार्यी व्यवस्था याठिकाणी नाही. नाणोली व वराळे ग्रामस्थांनसाठी तातडीने  पर्याय व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. 

 

नविन पुलाचे कीती नारळ फुटणार ; मोठी दुर्घटना घडल्यावर शासनाला जाग येणार का ?

वराळे--नाणोली येथील इंद्राई नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी  ५० वषार्पूर्वी केली होती.१९८५ मध्ये तत्कालीन मंत्री मदन बाफना यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. परंतु   अध्याप पूल झाला नाही. निकामी झालेली होडी नविन मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे पाठ पुरावाही केला या बाबत गेल्यावर्षी १६ जूनला ''लोकमत'' मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर  शासनाला जाग येणार का असा सवाल नागरिकांनी केला आहे. नविन होडी मिळावी  व पूलाचे काम सुरू करावे अशी मागणी माजी सभापती धोंडीबा मराठे, माऊली मराठे, विशाल लोंढे, अरूण लोंढे, संतोष लोंढे, मल्हारी कोंढे यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.  

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळriverनदीSchoolशाळाStudentविद्यार्थी