शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मावळमध्ये आचारसंहितेचा भंग तक्रारीची आयोगाकडून दखल; पोलिसांना चौकशी करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:17 IST

मावळ लोकसभेचा आखाडा आता रंग भरू लागला आहे. महायुतीने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भापकर यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर दीपक सिंगला यांनी पोलिसांना पत्र दिले आहे....

पिंपरी :मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरताना १०० मीटर नियमाचे उल्लंघन केले. महायुतीच्या १६ नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्याची दखल निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी घेतली आहे. पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मावळ लोकसभेचा आखाडा आता रंग भरू लागला आहे. महायुतीने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भापकर यांनी आयोगाकडे केली होती. त्यावर दीपक सिंगला यांनी पोलिसांना पत्र दिले आहे.

काय आहे भापकर यांची तक्रार

निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. दिनांक २२ एप्रिलला अर्ज दाखल करीत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारासहित एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश असतो, जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असा नियम होता. बारणे यांनी दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल केले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, अमर साबळे, बाळा भेगडे, महेश मालदी आदि १६ महायुतीचे नेते उपस्थित होते. बारणे यांनी चार नामनिर्देशन पत्र भरले. मात्र, हे चार नामनिर्देशन पत्र देताना चार, चार नेत्यांना त्यांच्यासमवेत घेऊन काही मिनिटांच्या अंतराने दाखल केले. हे नामनिर्देशन पत्र दाखल करताना एकच दिवशी, एकाच तारखेला काही मिनिटाच्या अंतराने आपल्यासमोर दाखल केले.

उमेदवाराने चार प्रतिनिधींच्या समवेत एकाच वेळी चार नामनिर्देश दाखल करणे अभिप्रेत होते. मात्र, तसे न करता बारणे यांनी पळवाट शोधली. आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. तसेच नेते व कार्यकर्ते आपल्या कार्यालयासमोर येऊन त्यांनी १०० मीटरच्या सीमारेषा ओलांडली. घोषणाबाजी केली. बारणे व त्यांच्या समवेत १६ नेत्यांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी १०० मीटरच्या आत प्रवेश दिलाच कसा असा सवाल करीत कारवाईची मागणी केली.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPuneपुणेmaval-pcमावळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४