शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

आयुक्त साहेब, मध्यरात्री शांतता भंग करणाऱ्यावर कारवाई कधी?

By विश्वास मोरे | Updated: January 22, 2025 16:32 IST

रस्त्यांवर रात्रीच्या पार्ट्यांमुळे ध्वनिप्रदूषण : नियमांची पायमल्ली

पिंपरी : वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री १२ वाजेच्या सुमारास शहरातील चौकांमध्ये टोळक्याने जमा होऊन फटाके वाजवून शहराची शांतता भंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणही होते. कसलीही भीती नसलेल्या टोळक्यांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबाजवणी व्हावी यासाठी पर्यावरणवादी ॲड. विकास शिंदे यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये रात्रीच्या १२ वाजता धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. चौकात २५-३० तरुण टोळक्याने जमतात. जमिनीवर आणि आकाशात आवाज करणारे फटाके अर्धा-एक तास वाजवले जातात. आवाजाने शहरातील शांतता भंग होऊन मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषण होत आहे. लहान मुले, आजारी आणि वयस्करांसाठी हे सर्व घातक ठरत आहे.प्रदूषणात पडतेय भरसर्वोच्च व उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. रात्री १० नंतर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बाबी (स्पीकर, फटाके) रोखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत आहे. रात्रीच्या वेळी फटाके वाजायला लागल्यानंतर अनेक नागरिक ११२ या पोलिस कंट्रोल रूमला कॉल करतात. तेव्हा पोलिस येऊन फक्त या मुलांना त्या ठिकाणावरून जाण्यास सांगतात.

रात्रीच्या १२ वाजता साजरे होणारे वाढदिवस, त्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, शहरातील भंग होणारी शांतता, झुंडीने गोळा झाल्यामुळे रात्रीची वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत. शहरांमध्ये रात्रीच्या १० नंतर फटाके वाजवून वाढदिवस साजरे करण्यास बंदीचे आदेश काढावेत. दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. - ॲड. विकास शिंदे (पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcivic issueनागरी समस्याPoliceपोलिसpollutionप्रदूषण