शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ताथवडे येथील महावितरण कार्यालयावर टाळाबंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 18:38 IST

वारंवार तक्रारी करुनही त्याची दखल न घेतल्याने ताथवडे येथील महावितरणाच्या कार्यालयाला विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठाेकले.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : वारंवार  अाणि तासंतास खंडित होणारी वीज, वेळेत दखल न घेणारे व नागरिकांच्या तक्रारींना अरेरावीची भाषा करून उद्धट वागणून देणाऱ्या ताथवडे येथील महावितरण उप विभागीय कार्यालयाला रविवारी ( दि.२६ ) सकाळी अकराच्या सुमारास विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठोकुन कामकाज बंद पाडले. यावेळी महावितरण सनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय मरकड, सदस्या भारती विनोदे, मधुकर बच्चे, देविदास शिंदे, संकेत मरकड, तेजस चौरे,युवराज शिंदेआदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.             या भागातील वीज समस्या गंभीर बनली असून नागरिकांना वारंवार त्याचा सामना करावा लागत आहे. तसेच कर्मचाऱ्याकडून तक्रारदार नागरिकांना उद्धट वागणूक मिळते तसेच तक्रारींची दखल घेतली जात नाही. अनेकदा फोन खनानुन देखील ते उचलले जात नाहीत अथवा उचलले तर समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. होईल, बघू, करू अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात अशा असंख्य तक्रारी समितीकडे आल्या होत्या. समितीने याची पडताळणी करण्यासाठी रविवारी सकाळी थेरगाव परिसरात विद्युत पुरवठा होत नसल्याची तक्रार केली. यावेळी तेथील कर्मचाऱ्याने समितीने सदस्याशी उद्धट वर्तन करीत समधनाकारक उत्तरे दिली नाहीत.

       त्यामुळे समितीच्या सदस्यांनी थेट महावितरण कार्यालय गाठून पाहणी केली असता त्याठिकाणी महावितरणचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. नागरिकांच्या तक्रारीसाठी नेमलेला कर्मचारी तक्रारींची कागदोपत्री नोंद घेत नसल्याचे आढळले. तसेच तेथील मस्टर वर एकाही तक्रारीची नोंद नसल्याचे निदर्शनास आले याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्याने  तक्रार मस्टरमध्ये नोंदवत नसल्याचे संगीतले. त्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून थेट कार्यालया टाळे ठोकले. टाळे ठोकल्यानंतरही तब्बल तीन तास महावितरणचा एकही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही. वाकड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन समितीच्या सदस्यांची समजूत घालून टाळे उघडुन कामकाज पूर्ववत केले.    

शहानिशा करून तक्रार निवारण करण्याचा प्रयत्न करतो      आमच्याकडे मनुष्यबळ कमी असून त्या तुलनेने परिसर खूप मोठा आहे त्यामुळे काही वेळा इच्छा असूनही वेळेत पोहचता येत नाही मात्र तरीसुद्धा तक्रारी वेळेत दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सकाळी थेरगाव येथून तक्रार आली त्याठिकाणी आमचा कर्मचारी गेला देखील मात्र तक्रार दिलेल्या व्यक्तीचा योग्य पत्ता आम्हाला देण्यात न आल्याने आम्ही त्याच्याकडे पोहचू शकलो नाही. मात्र यापूढे आणखी उत्तम आणि तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करू. - प्रकाश नाईकवडे  (सहायक अभियंते ताथवडे उपविभागीय कार्यालय महावितरण) यापुढे हयगय न करता कारवाई        आपल्या शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना मूलभूत असणारी वीज तासनतास खंडित होणं म्हणजे लाजिरवांनी बाब आहे शिवाय तक्रार देणारयाला उद्धट वागणूक देणे हे त्यापेक्षा चुकीचे आहे त्यामुळे फोन उचलण्यास टाळाटाळ करणाऱ्या ताथवडेतील कर्मचाऱ्यावर ज्याप्रमाणे निलंबनाची कारावाई करण्यात आली त्याचप्रमाणे कर्मचारी असो अथवा वरिष्ठ अधिकारी लोकांना योग्य सेवा न दिल्यास आम्ही निलंबनाची कारवाई करनार आहोत.- संजय मरकड (विद्यत सनियंत्रण समितीचे अध्यक्ष)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडmahavitaranमहावितरणelectricityवीज