शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पिंपरीतील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत आधार कार्ड देण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 10:57 IST

३१ मार्चपर्यंत नोंदणी अद्यावतीकरण पूर्ण करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सूचना

ठळक मुद्देकोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शहरातील बहुतांश आधार कार्ड केंद्र होते बंद शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण केले बंधनकारक

पिंपरी : शहरातील ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे अद्यापही बाकी आहे. राज्यातील १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरण ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करा, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत शिल्लक असलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि अद्यावतीकरण करण्याचे आव्हान शिक्षण विभागावर आहे.

शहरातील ३ लाख १९ हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५६ हजार ६६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही काढलेले नाही. पिंपरी विभागातील ४८.३० टक्के, तर आकुर्डी विभागातील ५२.३७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शहरातील बहुतांश आधार कार्ड केंद्र बंद होते. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ही आधार नोंदणी राहिलेली आहे. मार्चपासून शाळा बंद आहेत. आधार कार्ड काढण्याच्या मशीन उपलब्ध नाहीत. आदी कारणांमुळे आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणाचे काम रखडले आहे.

शालेय पोषण आहार योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सरल संकेतस्थळावर उपलब्ध असावी. संबंधितांना लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी म्हणजेच एकच आधार; पण २ नावांचे वेगळे विद्यार्थी दाखविल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी सर्व विद्यार्थी आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण बंधनकारक केले आहे.---

कोरोनामुळे आधार कार्ड काढण्याचे आणि अद्यावतीकरण करण्याचे काम राहिलेले आहे. मार्चपासून शाळाही बंद आहेत. शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि अद्यावतीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणAdhar Cardआधार कार्ड