शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

प्रशासनाच्या चुकीमुळेच रखडल्या उमेदवारांच्या नियुक्त्या, निवड झालेले उमेदवार संतप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 14:19 IST

लवकरात लवकर नियुक्ती देण्याची मागणी

ठळक मुद्देनिवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्यास सरकारच जबाबदार

पिंपरी: विविध प्रशासकीय विभागासाठी निवड होऊनही मराठा समाजातील उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही. इतर समाजातील उमेदवार निवड होऊन कामावर रुजूही झाले आहेत. सरकारच्या चुकीमुळेच या नियुक्त्या झाल्या नसल्याची संतप्त भावना उमेदवार व्यक्त करत आहेत.

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून विविध प्रशासकीय विभागात निवड झालेल्या उमेदवारांची निवड होऊनही त्यांना नियुक्ती दिलेली नाही. सरकारने देऊ केलेल्या श्रेणीनुसार परीक्षा आणि निवड प्रक्रियेतून आमची निवड झाली आहे. आमची निवड ऑगस्ट २०१९ मध्येच झाली असताना नियुक्तीस विलंब का झाला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यापूर्वीच राज्यातील २ हजार १८५ उमेदवार पात्र झाले आहेत. या नियुक्त्या का करून घेतल्या जात नाहीत. ऊर्जा खात्यात ऑगस्ट २०१९ मध्ये उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली. निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यांना नियुक्त्या देणे अपेक्षित होते. या नियुक्त्या ताटकळत ठेवण्यात आल्या. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेले आणि इतर उमेदवारांची नियुक्त्या शासनाच्या चुकीमुळे रखडल्या आहेत. शासनाने जबाबदारी स्वीकारून कोणावरही अन्याय न करता निवड झालेल्या सर्वांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. असे तहसीलदार पदासाठी निवड निरंजन कदम याने सांगितले. 

उपकेंद्र सहाय्य पदासाठी निवड होऊन एक वर्ष उलटले. तरीही नियुक्तीपत्र दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. निवड प्रक्रिया त्या पूर्वी पार पडली आहे. सरकारने त्यातून मार्ग काढून नियुक्ती दिली पाहिजे. ऊर्जा मंत्री पदोन्नती आरक्षणाबाबत एक आणि मराठा उमेदवारांच्या नियुक्ती बाबत वेगळी भूमिका घेताना दिसतात. नियुक्ती देण्यास विलंब होत असल्याचा निषेध म्हणून मी मुंडण केले. असे सचिन चव्हाण म्हणाला आहे.  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणMPSC examएमपीएससी परीक्षा