शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पोलीस म्हणून आले...तिघांचे अपहरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:01 IST

उत्तर प्रदेश येथील पोलीस आहोत न्यायालयात हजर राहण्यासाठी तिघांना तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देहिंजवडी पोलिसांकडे आरोपींविरोधात गुन्हा दाखल हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता तिघांवर गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट

पिंपरी : बावधन येथील पाटीलनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करून एक महिला, पाच वर्षांचे बालक आणि एकजण अशा तिघांचे रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले. राहत्या घरातून तिघांना पळवून नेण्याचा प्रकार घडला. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता व्यकतींचा शोध न लागल्याने २५ वर्षीय महिलेने सोमवारी हिंजवडी पोलिसांकडे दोन संशयित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस म्हणून आलेल्या एख महिला व एक पुरुष यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलभ रतन (वय २७), रोमा सिंग (वय २६) आणि दर्श (वय ५) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. रोमा सिंग हिचे पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला असून त्यानंतर तिने निलब याच्याशी लग्न केले. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक चार ते पाचजण पोलिसांच्या वेशात आले. उत्तर प्रदेश येथील पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश येथे रोमा सिंग आणि निलब यांच्यावर न्यायालयात दावा सुरु असल्याचे कारण सांगून न्यायालयात हजर राहण्यासाठी तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले. रोमा सिंग आणि निलब तसेच पाच वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांना बळजबरीने मोटारीत बसवुन ते घेऊन गेले. याबाबत निलभ यांच्या बहिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता,रामा सिंग आणि निलब यांच्यावर संबंधित पोलिसांकडे गुन्हा दाखल नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्यावर न्यायालयात दावा सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून तिघांचे अपहरण केले असल्याचा संशय बळावला आहे. पोलीस वेशात आलेले ते नेमके कोण होते. त्यांनी या तीन लोकांचे अपहरण का केले या सगळ््या प्रश्नांच्या उत्तरासह हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrimeगुन्हाKidnappingअपहरणUttar Pradeshउत्तर प्रदेश