शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पोलीस म्हणून आले...तिघांचे अपहरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:01 IST

उत्तर प्रदेश येथील पोलीस आहोत न्यायालयात हजर राहण्यासाठी तिघांना तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देहिंजवडी पोलिसांकडे आरोपींविरोधात गुन्हा दाखल हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता तिघांवर गुन्हा दाखल नसल्याचे स्पष्ट

पिंपरी : बावधन येथील पाटीलनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करून एक महिला, पाच वर्षांचे बालक आणि एकजण अशा तिघांचे रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले. राहत्या घरातून तिघांना पळवून नेण्याचा प्रकार घडला. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता व्यकतींचा शोध न लागल्याने २५ वर्षीय महिलेने सोमवारी हिंजवडी पोलिसांकडे दोन संशयित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस म्हणून आलेल्या एख महिला व एक पुरुष यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलभ रतन (वय २७), रोमा सिंग (वय २६) आणि दर्श (वय ५) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. रोमा सिंग हिचे पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला असून त्यानंतर तिने निलब याच्याशी लग्न केले. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक चार ते पाचजण पोलिसांच्या वेशात आले. उत्तर प्रदेश येथील पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश येथे रोमा सिंग आणि निलब यांच्यावर न्यायालयात दावा सुरु असल्याचे कारण सांगून न्यायालयात हजर राहण्यासाठी तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले. रोमा सिंग आणि निलब तसेच पाच वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांना बळजबरीने मोटारीत बसवुन ते घेऊन गेले. याबाबत निलभ यांच्या बहिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता,रामा सिंग आणि निलब यांच्यावर संबंधित पोलिसांकडे गुन्हा दाखल नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्यावर न्यायालयात दावा सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून तिघांचे अपहरण केले असल्याचा संशय बळावला आहे. पोलीस वेशात आलेले ते नेमके कोण होते. त्यांनी या तीन लोकांचे अपहरण का केले या सगळ््या प्रश्नांच्या उत्तरासह हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrimeगुन्हाKidnappingअपहरणUttar Pradeshउत्तर प्रदेश