शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 20:20 IST

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत, आज महायुतीची पिंपरी चिंडवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी मोठं विधान केलं. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत होते. महायुतीने आतापर्यंत ४५ जागांचा तिढा सोडवला आहे. पण, अजूनही काही जागांसाठी चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार सुनिल शेळके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत, यादरम्यान महायुती टिकून राहावी अशी प्रार्थना करतो", असं आमदार सुनिल शेळके यांनी विधान केलं आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

Lok Sabha Election 2024 : बाबो! दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट, 'या' महिला उमेदवाराकडे १४०० कोटींची संपत्ती

"निवडणूक होईल, निवडणुकीत प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे. ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल त्यांनी ती काम केली पाहिजेत. सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी अशी देवाकडे प्रार्थना करतोय', असं विधान आमदार सुनिल शेळके यांनी केलं. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शेळके म्हणाले, ही सगळी मंडळी कशी पटापटा पळतील त्याचाही विचार करतोय. ही मला चार साडेचा वर्ष झाले सापडतच नव्हती, मला बघू पळायची.आज सगळे सापडले. त्यामुळे माझा उर भरून आलाय. त्यामुळे सगळ्यांना मिठ्या मारायला पाहिजेत, असा टोलाही आमदार सुनिल शेळके यांनी लगावला.  

आमदार सुनिल शेळके म्हणाले, आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो तर गणेशभाऊ भेगडे म्हणतील तु गळ्यात पडायच्या आधी तुला कसा ढकलतील हे बघतोय पण तुम्हालाही माहित नसंल तुमच्या खाली मी सुद्धा सुरुंग लावून बसलो आहोत, असंही आमदार शेळके म्हणाले.

"कुठल्या मुहूर्तावर मी आमदार झालो हेच मला कळेना, मला मुहूर्त सांगितला तेव्हा मी फॉर्म भरुन आलो. पण, पाच वर्षाच्या आत मी जे चित्र पाहिलं आहे. असं काही अनुभवलं आहे. की पुढच्या पंचवीस वर्षात देखील असं चित्र पाहता येणार नाही. कोविडचा काळ पाहिला, सकाळचा शपथविधी पाहिला. परत महाविकास आघाडी झाली, त्यानंतर परत विरोधात जाऊन बसलो त्यानंतर महायुतीत आलो. सगळ्यांसोबत सत्तेत बसलो आणि सगळ्यांसोबत विरोधात बसलो पण, मावळच्या जनतेसाठी तिथं जावं लागेल तिथं जायची वेळ आली तरी मान अपमान पाहिला नाही, या जनतेसाठी जी भूमिका घ्यावी लागली ती भूमिका घेतली, असंही आमदार सुनिल शेळके म्हणाले.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४