शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

कोरोनाच्या संकटात एका तपानंतर राम - लक्ष्मणाची जोडी आली एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:19 IST

उद्योजक नाहर कुटुंब एकत्र आल्याचा नातेवाइकांना आनंद

ठळक मुद्देजीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा ठरला

हणमंत पाटील

पिंपरी: कोरोनाच्या संकटात मुले आई-वडिलांना स्वीकारत नाहीत. आधाराची गरज असताना अनेक जवळचे मित्र व नातेवाईक दूर जातात. मदत करावी लागेल म्हणून बोलणेही टाळतात. अशा नकारात्मक गोष्टी समोर येत असतानाही पुणेपिंपरी-चिंचवड येथील नाहर कुटुंबातील राम-लक्ष्मणाची जोडी याच कोरोनाच्या संकटात तब्बल एक तपानंतर एकत्र आल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथे नाहर कुटुंबातील २३ सदस्य एकत्र राहतात. कुटुंबातील चार बहीण-भावंडे एकत्र लहानाचे मोठी झाली. त्यापैकी संजय नाहर हे उद्योग व्यावसायानिमित्ताने भोसरी येथे स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे राजेश यांनाही तिकडे येण्याचा आग्रह केला. राजेश यांना चाकण भागात कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. दोन्ही भाऊ अनेक वर्ष एकत्र असल्याने त्यांना ‘राम-लक्ष्मणा’ची जोडी म्हणून समाजात ओळखले जात होते. मात्र मुले मोठी झाल्यानंतर राजेश यांनी त्यांच्या शिक्षणासाठी पुन्हा पुण्यात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाऊ आपल्यापासून दूर जात असल्याने संजय नाहर नाराज झाले. त्यानंतर दोघांमध्ये गैरसमज वाढत गेले. त्यामुळे एकमेकांशी बोलणे, भेटणे आणि काैटुंबिक सण-समारंभालाही एकत्र येणे बंद झाले. त्यानंतर संजय यांनीही पुण्यातील आई व इतर भावंडाकडे जाणे पूर्ण बंद केले.

दरम्यान, कुटुंबापासून एकाकी असलेल्या संजय यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले. या काळात पुन्हा कुटुंबाची तीव्रतेने त्यांना आठवण येऊ लागली. आतापर्यंतचा सर्व प्रवास आठवू लागला. त्यामध्ये आपल्या काही चुकांमुळे आपल्या रक्ताचे नाते कसे दुरावले. आपण या संकटातून वाचू शकलो, नाही तर आपल्याला भगवान महावीर माफ करणार नाहीत. अशी तीव्र जाणीव महावीर जयंती दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना झाली. अन् घडलेही तसेच, तब्बल १२ वर्षे दुरावलेला त्याचा भाऊ राजेश कोणतीही कल्पना नसताना त्यांना आधार देण्यासाठी मुलांसह थेट हॉस्पिटलमध्ये सेवेसाठी आला. त्यावेळी संजय यांनाही आनंदाश्रू लपवता आले नाहीत. त्यानंतर ते बंधूंच्या मोबाईलवरून आईशी बोलले.

नात्याचा आधार प्राणवायूसारखा...

जीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा वाटला. त्यामुळे संजय यांनी लवकर कोरोनाच्या संकटावर मात केली. कोरोनाच्या संकटाने आम्हाला पुन्हा एकत्र आणल्याची भावना नाहर कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

कोरोनातून बरा झाल्यानंतर सर्वांची माफी मागून कुटुंबात पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. माझ्या बंधूने कात्रज येथे बांधलेल्या माता मंदिरात एकत्र भेटण्याचा आम्ही निर्णय घेतला. केवळ भावाने बांधलेले मंदिर म्हणून मी त्या मंदिरात एकदाही गेलो नव्हतो. तेथे आम्ही एकत्र आलो. आता कायम एकत्र राहणार आहे. असे उद्योजक संजय नाहर यांनी सांगितले. 

आमचे पूर्वीपासून एकमेकांवर घट्ट प्रेम होते. मात्र, मी पुण्यात गेल्याने काही गैरसमज निर्माण झाले होते. कोरोनाच्या संकटात पुन्हा आम्ही एकमेकांच्या मदतीला धावून गेलो. संकटकाळात रक्ताचे नातेच एकमेकांच्या मदतीला येई शकते, हे सिद्ध झाले. आम्ही दोघे एकत्र आल्याने आनंदाने आमच्या ७५ वर्षांच्या आईचे आयुष्य आणखी वाढेल. तसेच देशभरातील पाच हजार नाहर बांधवाना एकत्र आणताना आपल्या सोबत आपलाच भाऊ नसल्याची माझ्या मनातील खंतही या भेटीने संपली.                                                                                       राजेश नाहर, अध्यक्ष, ऑल इंडिया नाहर परिवार, पुणे 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकhospitalहॉस्पिटलbusinessव्यवसाय