शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोरोनाच्या संकटात एका तपानंतर राम - लक्ष्मणाची जोडी आली एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:19 IST

उद्योजक नाहर कुटुंब एकत्र आल्याचा नातेवाइकांना आनंद

ठळक मुद्देजीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा ठरला

हणमंत पाटील

पिंपरी: कोरोनाच्या संकटात मुले आई-वडिलांना स्वीकारत नाहीत. आधाराची गरज असताना अनेक जवळचे मित्र व नातेवाईक दूर जातात. मदत करावी लागेल म्हणून बोलणेही टाळतात. अशा नकारात्मक गोष्टी समोर येत असतानाही पुणेपिंपरी-चिंचवड येथील नाहर कुटुंबातील राम-लक्ष्मणाची जोडी याच कोरोनाच्या संकटात तब्बल एक तपानंतर एकत्र आल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी येथे नाहर कुटुंबातील २३ सदस्य एकत्र राहतात. कुटुंबातील चार बहीण-भावंडे एकत्र लहानाचे मोठी झाली. त्यापैकी संजय नाहर हे उद्योग व्यावसायानिमित्ताने भोसरी येथे स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे राजेश यांनाही तिकडे येण्याचा आग्रह केला. राजेश यांना चाकण भागात कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. दोन्ही भाऊ अनेक वर्ष एकत्र असल्याने त्यांना ‘राम-लक्ष्मणा’ची जोडी म्हणून समाजात ओळखले जात होते. मात्र मुले मोठी झाल्यानंतर राजेश यांनी त्यांच्या शिक्षणासाठी पुन्हा पुण्यात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाऊ आपल्यापासून दूर जात असल्याने संजय नाहर नाराज झाले. त्यानंतर दोघांमध्ये गैरसमज वाढत गेले. त्यामुळे एकमेकांशी बोलणे, भेटणे आणि काैटुंबिक सण-समारंभालाही एकत्र येणे बंद झाले. त्यानंतर संजय यांनीही पुण्यातील आई व इतर भावंडाकडे जाणे पूर्ण बंद केले.

दरम्यान, कुटुंबापासून एकाकी असलेल्या संजय यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले. या काळात पुन्हा कुटुंबाची तीव्रतेने त्यांना आठवण येऊ लागली. आतापर्यंतचा सर्व प्रवास आठवू लागला. त्यामध्ये आपल्या काही चुकांमुळे आपल्या रक्ताचे नाते कसे दुरावले. आपण या संकटातून वाचू शकलो, नाही तर आपल्याला भगवान महावीर माफ करणार नाहीत. अशी तीव्र जाणीव महावीर जयंती दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना झाली. अन् घडलेही तसेच, तब्बल १२ वर्षे दुरावलेला त्याचा भाऊ राजेश कोणतीही कल्पना नसताना त्यांना आधार देण्यासाठी मुलांसह थेट हॉस्पिटलमध्ये सेवेसाठी आला. त्यावेळी संजय यांनाही आनंदाश्रू लपवता आले नाहीत. त्यानंतर ते बंधूंच्या मोबाईलवरून आईशी बोलले.

नात्याचा आधार प्राणवायूसारखा...

जीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा वाटला. त्यामुळे संजय यांनी लवकर कोरोनाच्या संकटावर मात केली. कोरोनाच्या संकटाने आम्हाला पुन्हा एकत्र आणल्याची भावना नाहर कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

कोरोनातून बरा झाल्यानंतर सर्वांची माफी मागून कुटुंबात पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. माझ्या बंधूने कात्रज येथे बांधलेल्या माता मंदिरात एकत्र भेटण्याचा आम्ही निर्णय घेतला. केवळ भावाने बांधलेले मंदिर म्हणून मी त्या मंदिरात एकदाही गेलो नव्हतो. तेथे आम्ही एकत्र आलो. आता कायम एकत्र राहणार आहे. असे उद्योजक संजय नाहर यांनी सांगितले. 

आमचे पूर्वीपासून एकमेकांवर घट्ट प्रेम होते. मात्र, मी पुण्यात गेल्याने काही गैरसमज निर्माण झाले होते. कोरोनाच्या संकटात पुन्हा आम्ही एकमेकांच्या मदतीला धावून गेलो. संकटकाळात रक्ताचे नातेच एकमेकांच्या मदतीला येई शकते, हे सिद्ध झाले. आम्ही दोघे एकत्र आल्याने आनंदाने आमच्या ७५ वर्षांच्या आईचे आयुष्य आणखी वाढेल. तसेच देशभरातील पाच हजार नाहर बांधवाना एकत्र आणताना आपल्या सोबत आपलाच भाऊ नसल्याची माझ्या मनातील खंतही या भेटीने संपली.                                                                                       राजेश नाहर, अध्यक्ष, ऑल इंडिया नाहर परिवार, पुणे 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकhospitalहॉस्पिटलbusinessव्यवसाय