शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पिंपरीत अपघातानंतर ३११ जणांनी केले पलायन; माणुसकी मेलेल्या या वाहनचालकांचे करायचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 12:08 IST

अपघातानंतर घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती देण्याचे तसेच अपघातग्रस्त व जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्य ते दाखवत नाहीत

पिंपरी : बेशिस्तपणे वाहन चालवून दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना धडक देऊन काही चालक भरधाव निघून जातात. अपघातानंतर घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती देण्याचे तसेच अपघातग्रस्त व जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे औदार्य ते दाखवत नाहीत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत साडेतीन वर्षांत अशा ३११ जणांनी अपघातानंतर पलायन केले. माणुसकी मेलेल्या या वाहनचालकांचे करायचे काय? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.

अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहनचालकांना शोधण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. संबंधित वाहन चालकास लगेच जामीन मिळतो. त्यामुळे संबंधित वाहन चालकाला घटनेचे आणि गुन्ह्याचे गांभीर्य राहत नाही. याला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

३०४ (अ) ऐवजी ३०४ (२) या कलमाचे उपसले हत्यार

अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी पोलिसांकडून ३०४ (अ) ऐवजी ३०४ (२) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालकाला किंवा आरोपीला जामीन मिळत नाही. तसेच १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अपघातस्थळी थांबून वाहन चालकाने जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे. जेणेकरून वेळेत उपचार मिळून त्याचे प्राण वाचू शकतील, तसेच वाहन चालकाने स्वत: पोलिसांना माहिती द्यावी, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.

नेमका काय फरक आहे कलमांमध्ये...

- ३०४ (अ)

अपघातप्रकरणी ३०४ (अ) प्रमाणे गुन्हे दाखल केले जातात. जो कोणी हयगयीचे अगर निष्काळजीपणाचे, बेदरकारपणाचे कृत्य करून मृत्यू घडवितो; पण तो सदोष मनुष्यवध होत नाही. त्यास कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दोन वर्षांपर्यंत असू शकेल, अगर द्रव्यदंड अगर दोन्ही शिक्षा होतील, अशी या कलमाची व्याख्या आहे. या व्याख्येनुसार मृत्यू घडविण्यामागे आरोपीचा इरादा किंवा त्याला जाणीव नसते. मात्र, त्याने केलेले कृत्य हे बेदरकारपणाचे, हयगयीचे, निष्काळजीपणाचे असते. हा गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या समोर चालवला जातो.

- ३०४ (२)

पिंपरी-चिंचवड पोलीस ३०४ (२) नुसार गुन्हे दाखल करीत आहेत. ‘जाणीवपूर्वक केलेले कृत्य’ अशी या कलमाची व्याख्या आहे. आपण करीत असलेल्या कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, याची आरोपीला माहिती असल्यामुळे या कलमाचा वापर प्रभावी ठरत आहे. या कलमाच्या वापरामुळे हा गुन्हा बिगर जामिनाचा व जिल्हा व सत्र न्यायालयात जातो.

अपघातानंतर जखमीला त्वरित रुग्णालयात दाखल केल्यास गोल्डन अवरमध्ये उपचार मिळून त्याचे प्राण वाचू शकतात. मात्र, प्रत्यक्षदर्शी नागरिक मारहाण करीत असल्याचे कारण देऊन अनेक वाहनचालक अपघातानंतर पळून जातात. अशा वेळी पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता वाहनचालक जाणीवपूर्वक पळून गेल्याचे काही प्रकरणांमध्ये तपासातून निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये भादंवि कलम ३०४ (२) चा प्रभावी वापर होत आहे. - मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १

वर्ष -                  प्राणांतिक अपघात       उघड गुन्हे

२०१९ -                            ३२१                    २२७२०२० -                            २७९                    १९२२०२१ -                            ३१८                    २३७२०२२ (जूनपर्यंत) -          १७५                    १२६

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलPuneपुणेPoliceपोलिस