शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

बिले रोखल्याने वाचवले तीनशे कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 04:02 IST

सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत.

पिंपरी : सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत. यामुळे महापालिकेचे ३०० कोटी रुपये वाचले आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभा-यांची पाठ थोपटली.भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले. या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनोगतामध्ये शहराच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. सीमा सावळे यांनी आभार केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.स्मार्ट, पारदर्शक कारभार कराई- इनॉग्रेशन’ या पद्धतीने विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने केल्यास अधिक लोकांशी बोलता येते. खर्चही वाचतो. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये क्षमता आहे. स्मार्ट, पारदर्शक कारभार करा. महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.महापौरांचे लग्न अन् हशाअविवाहित महापौर नितीन काळजे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. मेट्रोही लवकर येत आहे. मात्र, अजूनही महापौर अविवाहीत कसे ? मी अविवाहित असतानाच नागपूरचा महापौर झालो. तेव्हा मलाही याचा त्रास झाला. त्यामुळे महापौरांच्या लग्नाविषयी उत्सुकता आहे. आम्हाला लग्नाला बोलवा अथवा न बोलवा; परंतु आता लग्नाचा विषय अजेंड्यावर घ्या.’’ यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला.पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्त्वत: मान्यता दिली आहे. वाढती लोकसंख्या पाहता, आयुक्तालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव गेला आहे; त्यामुळे लवकरच आयुक्तालय सुरू होईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री