शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

बिले रोखल्याने वाचवले तीनशे कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 04:02 IST

सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत.

पिंपरी : सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत. यामुळे महापालिकेचे ३०० कोटी रुपये वाचले आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभा-यांची पाठ थोपटली.भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले. या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनोगतामध्ये शहराच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. सीमा सावळे यांनी आभार केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.स्मार्ट, पारदर्शक कारभार कराई- इनॉग्रेशन’ या पद्धतीने विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने केल्यास अधिक लोकांशी बोलता येते. खर्चही वाचतो. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये क्षमता आहे. स्मार्ट, पारदर्शक कारभार करा. महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.महापौरांचे लग्न अन् हशाअविवाहित महापौर नितीन काळजे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. मेट्रोही लवकर येत आहे. मात्र, अजूनही महापौर अविवाहीत कसे ? मी अविवाहित असतानाच नागपूरचा महापौर झालो. तेव्हा मलाही याचा त्रास झाला. त्यामुळे महापौरांच्या लग्नाविषयी उत्सुकता आहे. आम्हाला लग्नाला बोलवा अथवा न बोलवा; परंतु आता लग्नाचा विषय अजेंड्यावर घ्या.’’ यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला.पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्त्वत: मान्यता दिली आहे. वाढती लोकसंख्या पाहता, आयुक्तालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव गेला आहे; त्यामुळे लवकरच आयुक्तालय सुरू होईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री