पावसाळ्यात डाळी - कडधान्य खराब होतात? डब्यात ठेवा ७ पदार्थ- अळ्या-किडे-बुरशीचा त्रास नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 17:26 IST2025-06-24T17:14:13+5:302025-06-24T17:26:14+5:30

Try These 8 Easy Ways to Prevent Bugs in Dry Dal and Lentils During the Rainy Season : Smart Ways to Keep Bugs Away from Dry Dal and Lentils This Rainy Season : Keep Your Dal and Lentils Bug-Free During the Monsoon – Try These Simple Methods : Try These Tips to Prevent Bugs in Dry Dal and Lentils : वर्षभरासाठी साठवून ठेवलेल्या डाळी - कडधान्य पावसाळ्यात सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स...

पावसाळा सुरू झाला की हवेत आर्द्रता वाढते आणि त्याचा थेट परिणाम घरात साठवलेल्या सुक्या डाळी, कडधान्यांवर (Try These 8 Easy Ways to Prevent Bugs in Dry Dal and Lentils During the Rainy Season) होतो. वेळीच योग्य काळजी न घेतल्यास यावर डाळी, धन्यांना बुरशी येणं, दुर्गंधी येणं किंवा कीड लागून खराब होणं अशा समस्या येतात. यासाठीच, स्वयंपाकघरातील साठवून ठेवलेल्या डाळी - कडधान्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या व उपयुक्त टिप्स पाहूयात( Try These Tips to Prevent Bugs in Dry Dal and Lentils).

डाळी-कडधान्य काचेच्या किंवा चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकच्या एअरटाईट डब्यांमध्ये भरून ठेवा, त्यामुळे बाहेरून येणारी ओलसर हवा आत जाणार नाही. यामुळे पावसाळ्यात देखील डाळी - कडधान्य खराब न होता चांगली टिकून राहतात.

साठवून ठेवलेल्या डाळी व कडधान्यांच्या डब्यांत सुकलेली कडुलिंबाची पाने व तमालपत्र घालून ठेवावे. ही दोन्ही पाने नैसर्गिक कीटकनाशकासारखं काम करतं यामुळे डाळी - कडधान्य खराब न होता सुरक्षित राहतात. यामुळे डाळी - कडधान्यांना कीड लागत नाही.

डाळी आणि कडधान्यांच्या डब्यात ४ ते ५ सुक्या लाल मिरच्या घालाव्यात यामुळे धान्य व कडधान्यांना कीड लागत नाही.

डाळी व कडधान्यांच्या डब्यात ४ ते ५ लवंग काड्या घालाव्यात. यामुळे पावसाळ्यात धान्य व कडधान्यांना कीड लागून ते खराब होत नाही तसेच दीर्घकाळ चांगले टिकून राहते.

प्रत्येक डाळी किंवा कडधान्यांच्या डब्यात थोडंसं कोरडं मीठ टाकल्यास ते ओलसरपणा शोषून घेते. या उपायांमुळे डाळींना बुरशी लागत नाही.

पावसाळ्यात ओलाव्याने डाळींना बुरशी - कीड लागू नये म्हणून डाळी स्टोअर करण्याआधी हलक्या कोरड्या भाजून मगच स्टोअर कराव्यात म्हणजे त्या खराब होत नाहीत.

मिठाप्रमाणेच आपण डाळी कडधान्यांच्या डब्यात चमचाभर हळद घालून ठेवू शकता. हळदीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे डाळी कडधान्य खराब होत नाहीत.

कडधान्यांमध्ये आपण ३ ते ४ थेंब मोहरीच्या तेलाचे घालून, कडधान्यांना हे तेल हलकेच चोळून लावू शकता यामुळे कडधान्यांना बुरशी - कीड लागत नाही.