ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पालकांनो, मुलांना सांगताय... पण तुम्ही स्वतः काय करता आहात? कुटुंबासाठी मोबाईल असा ठरतोय घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 13:56 IST
1 / 7पालक आपल्या मुलांना स्क्रीनपासून दूर राहण्याचा सल्ला देतात, परंतु ते स्वत: रात्री उशिरापर्यंत रील पाहताना दिसतात. सध्या सर्व वयोगटातील लोक डिजिटल नैराश्याला बळी पडत आहेत.2 / 7ही सवय त्यांच्या मानसिक-शारीरिक आरोग्यावर परिणाम करते, कौटुंबिक नातेसंबंधांनाही पोकळ बनवत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, पालक स्वत: व्यसनाचे बळी असतात.3 / 7तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुले घरी जे पाहतात तेच शिकतात. म्हणून, जेव्हा पालक स्क्रीनला चिकटून राहतात तेव्हा मुले देखील तशीच वागतात.4 / 7बरेच पालक जेवणादरम्यान, झोपण्यापूर्वी आणि अगदी शौचालयातही मोबाइल वापरतात. कुटुंबांनी ‘नो-फोन टाइम’, नो-रील डे आणि स्क्रीन-फ्री झोन यासारख्या कठोर धोरणांचा अवलंब केला पाहिजे. त्यांच्यासाठी डिजिटल शिस्त आवश्यक आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.5 / 7२५ वर्षांपर्यंतचे तरुण इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि ऑनलाइन गेमवर तासनतास घालवत आहेत. २५ ते ५० वयोगटातील लोक वेब सिरीज आणि ऑनलाइन शॉपिंगमध्ये अडकले आहेत.6 / 7वृद्ध लोकही आता व्हॉट्सॲप, फेसबुक आणि रील्सच्या जगात हरवले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाइल व्यसन आता फक्त एक सवय राहिलेली नाही तर ती एक गंभीर समस्या बनली आहे.7 / 7मोबाइलमुळे झोप कमी होत आहे, थकवा आणि चिडचिड वाढत आहे. नातेसंबंध कमकुवत होत आहेत आणि मानसिक संतुलन बिघडत आहे.