शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : लॉकडाऊन कधी हटवावा?, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:55 PM

1 / 15
भारतातील कोरोना व्हायरसचा संसर्ग अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 झाली आहे.
2 / 15
देशात आतापर्यंत 5 हजार 394 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 91 हजार 818 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी देशभरात पुन्हा एकदा आठ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
3 / 15
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.
4 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1 ची घोषणा केली.
5 / 15
एकीकडे लॉकडाऊन हटवल्याता लोकांमध्ये आनंद आहे. तर दुसरीकडे यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वेगानं तर होणार नाही ना? याची भीती निर्माण झाली आहे.
6 / 15
भारताच्या ICART (India Covid19 Apex Research Team) या टीमने लॉकडाऊन कधी आणि कसा हटवला जावा याबाबत अभ्यास केला आहे. AIIMSच्या डॉक्टरांनी लॉकडाऊन हटवण्याची योग्य वेळ सांगितली आहे.
7 / 15
AIIMSचे डॉक्टर गिरीधर गोपाल परमेश्वरन, मोहकृत गुप्ता, सप्तर्षी सोहम मोहंता आणि त्यांच्या टीमचा यामध्ये समावेश आहे. सरकारने आता आपली आरोग्य सेवा प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
8 / 15
देशात अचानक लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्याची चिंता आहे. जगात ज्या गतीने कोरोनाग्रस्तांच्या संख्या वाढत आहे. मात्र तशी परिस्थिती भारतात नाही आहे.
9 / 15
भारतातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र लॉकडाऊन हटवल्यास लोक घराबाहेर पडतील यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगानं होऊ शकतो.
10 / 15
देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या 7 दिवसांच्या रोलिंग एव्हरेजमध्ये अद्याप घट दिसून आलेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन शिथिल करणे योग्य नाही.
11 / 15
चीनमधील परिस्थिती पाहता टीमनं चीनमध्ये हा संसर्ग जवळजवळ संपला होता, मात्र कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. 13 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये 15,133 प्रकरणे नोंदली गेली.
12 / 15
दोन महिन्यांनंतर चीनने लॉकडाऊन हटवला. लॉकडाऊन शिथिल केला तर पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे.
13 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांची आवश्यकता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
14 / 15
कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. मात्र देशात आता सामुहिक संक्रमणाचा धोका वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी दावा केला आहे.
15 / 15
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. भारत जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकत कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत सातव्या स्थानी पोहोचला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरIndiaभारतDeathमृत्यू